शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सीआरपीएफ तळावर आत्मघाती हल्ला; पाच जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 11:32 IST

पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले

श्रीनगर : पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे दोन अतिरेकी ठार झाले.गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे २च्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणाºया सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले. अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ््यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला.तळाच्या आवारात घुसलेले अतिरेकी नंतर गोळीबार करत प्रशासकीय इमारतीच्या आश्रयास गेले. तोपर्यंत सीआरपीएफच्या स्वत:च्या जवानांखेरीज जम्मू-काश्मीर पोलीस आणि विशेष पथकाची कुमक आली. अतिरेकी लपलेल्या इमारतीस वेढा घातला गेला. सायंकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी अधून-मधून गोळीबार सुरू होता. दोन अतिरेक्यांना खिंडीत गाठून ठार करण्यात यश आले. घुसलेला तिसरा अतिरेकी न सापडल्याने, संध्याकाळपर्यंत तळाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू होती.हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. देशविरोधी शक्तींना भारताची भीती राहिलेली नाही, हेच अशा पुन्हा-पुन्हा होणाºया हल्ल्यांवरून दिसते. मोदींना देशाच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंविरुद्ध कणखर पावले उचलावीत. देशाच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचा अशा उपायांना पाठिंबाच राहील.-सुश्मिता देव, प्रवक्त्या, काँग्रेसशहिदांचे सांडलेले रक्त कामी येत आहे. ताल्हा रशीद, मोहम्मदभाई, कमांडर नूर मोहम्मद तंतरे आणि काश्मीरचे अन्य शहिदांचे वारस अजूनही शिल्लक आहेत. भारताचा शेवटचा सैनिक काश्मीर सोडून निघून जाईपर्यंत, असे हल्ले सुरूच राहतील.- जैश-ए-मोहम्मद (जबाबदारी स्वीकारतानाचे निवेदन)सीमेपलीकडून सशस्त्र दहशतवादी पाठविणे पाकिस्तान थांबविणार नाही, तोपर्यंत काश्मीरच्या जनतेला व सुरक्षा दलांना अशा घटनांना सामोरे जाणे टळणार नाही.- एस. पी. वैद, पोलीसमहासंचालक, जम्मू-काश्मीर

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश ए मोहम्मदJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला