शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पाहुण्या चित्त्यांना बोचणार नाहीत काटे; महाराष्ट्राच्या ग्रासमॅनची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 5:57 AM

२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता.

 नरेंद्र जावरेमेळघाट (जि. अमरावती) : मेळघाटातील ‘ग्रासमॅन’ प्रा. गजानन मुरतकर यांनी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलातील उजाड प्रदेशात २०१३ ते २०१९ अशी सलग सात वर्षे परिश्रम घेऊन व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नामिबियामधून आलेल्या चित्त्यांसाठी योग्य कुरणक्षेत्र तयार केले आहे. याच मऊ गवतावर आता चित्त्यांची पावले पडणार आहेत. 

२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आवश्यक कुरणक्षेत्र तयार करण्याचे काम सुरू झाले होते. तेव्हा शुष्क पानझडीचे हे जंगल होते. परंतु, सिंह सोडण्याची योजना रद्द झाली. मात्र, कुरणक्षेत्र तयार झाल्यानंतर चित्त्यांसाठी योग्य वातावरणनिर्मिती तपासण्यात आली. देशातील १४पेक्षा अधिक राज्यांमध्ये गवती कुरण तयार करण्याचा अनुभव असलेले मेळघाटातील ग्रासमॅन प्रा. गजानन मुरतकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. 

तिन्ही ऋतूंमध्ये कुनो पालपूरचे वातावरण चित्त्यांसाठी उत्कृष्ट आहे. डेहराडून व इतर सर्व संस्थांनीसुद्धा तसा अहवाल दिला. कुरणक्षेत्र सर्वाधिक प्रमाणात विकसित झाले आहे. तृणभक्षी प्राण्यांची मुबलक संख्या व नदी असल्याने पाहुणा चांगला स्थिरावणार, यात दुमत नाही.  - प्रा. गजानन मुरतकर, ग्रासमॅन, मेळघाट

दक्षिण आफ्रिकेच्या जंगलाशी कुनो पालपूर अभयारण्याचा परिसर मिळताजुळता असल्याचे आढळून आले आहे. गवा वगळता सर्व तृणभक्षी प्राणी असलेले कुनो हे देशातील पहिले अभयारण्य आहे. बोरीची काटेरी झाडे विपुल होती. कुरणक्षेत्र तयार करण्यात ते मोठे आव्हान होते. बोरीचे काटे चित्त्याच्या पायात रुतून जखमा होऊ नयेत म्हणून बोरीची झाडे पूर्णतः काढली गेली.