शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Sunrise Over Ayodhya : रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार - सलमान खुर्शीद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:15 PM

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी नुकतंच आपलं पुस्तक Sunrise over Ayodhya हे प्रकाशित केलं.

Sunrise over Ayodhya Salman Khurshid : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी नुकतंच आपलं पुस्तक 'Sunrise over Ayodhya' हे प्रकाशित केलं. यानंतर त्यांच्या पुस्तकातील काही भाग चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सलमान खुर्शीद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच निर्णयातील सकारात्मक गोष्टी पाहत आता देश या वादातून पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

"जे व्हायचं ते होऊन गेलं. हा निकाल आपल्याला एक संधी देत आहे ती आपल्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती कायमसाठी संपवून टाकावी. या निकालाचे तेच प्रयत्न आहेत," असं सलमान खुर्शीद म्हणाले. आजतकशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाबाबत अनेक पैलूंवर आपले विचारही व्यक्त केले.

"सार्वजनिक जीवनात देवाण-घेवाणीची स्थिती कायम असते," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पुस्तकातील एक भाग 'सॅफ्रन स्काय' याबाबत सुरु झालेल्या वादावरही आपलं मत व्यक्त केलं. "ज्यांना Hinduism माहित नाही ते लोक यावर प्रतिक्रिया देतील, ज्यांना त्याची माहिती आहे ते प्रतिक्रिया देणार नाहीत. ज्यांना हिंदू धर्म, इस्लाम माहित नाही त्यांची वाद काय घालायचा?," असंही त्यांनी नमूद केलं. रामराज्यवर बोलताना त्यांनी हा एक व्यापक विचार आहे आणि या चॅप्टरमध्ये हिंदू धर्माबबत वक्तव्य केलं गेलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

'...तो एक व्यापक विचार'"रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार आहे. जसं रामराज्य आहे तसंच जर तुम्ही इस्लामकडे पाहिलं तर त्यामुळे निजाम-ए-मुस्तफाबद्दल सांगण्यात आलं आहे, हे अगदी तसंच आहे. एकच विचार आहे, एकच मार्ग आहे. आपण केवळ शब्दांमध्ये अडकून राहू नये, यासाठी आम्ही खऱ्यापर्यंत पोहोचू शकू इतकं या पुस्तक कामी यावं," असंही खुर्शीद यांनी नमूद केलं. 

"६ डिसेंबर १९९२ रोजी जे काही घडलं ते चुकीचं होतं. ही अशी घटना होती ज्यानं संविधानाला बदनाम केलं. दोन समुदायांमध्ये एक दरी निर्माण झाली. हे चुकीचं होतं. मी १०० वेळा सांगेन हे चुकीचं होतं. जवळपास ३०० जणांना मुक्त करण्यात आलं, जसं कोणी जेसिकाला मारलं नाही, तसंच बाबरी मशीद कोणी उद्ध्वस्त केली नाही," असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुस्तकाच्या प्रकाशादरम्यान केलं.

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय