शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Sunrise Over Ayodhya : रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार - सलमान खुर्शीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 22:15 IST

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी नुकतंच आपलं पुस्तक Sunrise over Ayodhya हे प्रकाशित केलं.

Sunrise over Ayodhya Salman Khurshid : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी नुकतंच आपलं पुस्तक 'Sunrise over Ayodhya' हे प्रकाशित केलं. यानंतर त्यांच्या पुस्तकातील काही भाग चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सलमान खुर्शीद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच निर्णयातील सकारात्मक गोष्टी पाहत आता देश या वादातून पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

"जे व्हायचं ते होऊन गेलं. हा निकाल आपल्याला एक संधी देत आहे ती आपल्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती कायमसाठी संपवून टाकावी. या निकालाचे तेच प्रयत्न आहेत," असं सलमान खुर्शीद म्हणाले. आजतकशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाबाबत अनेक पैलूंवर आपले विचारही व्यक्त केले.

"सार्वजनिक जीवनात देवाण-घेवाणीची स्थिती कायम असते," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पुस्तकातील एक भाग 'सॅफ्रन स्काय' याबाबत सुरु झालेल्या वादावरही आपलं मत व्यक्त केलं. "ज्यांना Hinduism माहित नाही ते लोक यावर प्रतिक्रिया देतील, ज्यांना त्याची माहिती आहे ते प्रतिक्रिया देणार नाहीत. ज्यांना हिंदू धर्म, इस्लाम माहित नाही त्यांची वाद काय घालायचा?," असंही त्यांनी नमूद केलं. रामराज्यवर बोलताना त्यांनी हा एक व्यापक विचार आहे आणि या चॅप्टरमध्ये हिंदू धर्माबबत वक्तव्य केलं गेलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

'...तो एक व्यापक विचार'"रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार आहे. जसं रामराज्य आहे तसंच जर तुम्ही इस्लामकडे पाहिलं तर त्यामुळे निजाम-ए-मुस्तफाबद्दल सांगण्यात आलं आहे, हे अगदी तसंच आहे. एकच विचार आहे, एकच मार्ग आहे. आपण केवळ शब्दांमध्ये अडकून राहू नये, यासाठी आम्ही खऱ्यापर्यंत पोहोचू शकू इतकं या पुस्तक कामी यावं," असंही खुर्शीद यांनी नमूद केलं. 

"६ डिसेंबर १९९२ रोजी जे काही घडलं ते चुकीचं होतं. ही अशी घटना होती ज्यानं संविधानाला बदनाम केलं. दोन समुदायांमध्ये एक दरी निर्माण झाली. हे चुकीचं होतं. मी १०० वेळा सांगेन हे चुकीचं होतं. जवळपास ३०० जणांना मुक्त करण्यात आलं, जसं कोणी जेसिकाला मारलं नाही, तसंच बाबरी मशीद कोणी उद्ध्वस्त केली नाही," असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुस्तकाच्या प्रकाशादरम्यान केलं.

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय