शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी

By admin | Published: July 06, 2017 1:42 PM

जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 6 - जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. चिनी सरकारच्या मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये हिमालयामधील देशांना भारताने आपल्या मागे ओढू नये असा सूर उमटला आहे. संपादकीयामध्ये भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजुने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा देईल असे म्हटले आहे.
भारत सीमाभागामध्ये आगळिक करत असून त्याची भारी किंमत भारताला मोजावी लागेल अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे. चीनमधील सरकारी मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेला सूर हा चिनी सरकारची अधिकृत भूमिका मानण्यात येते. या पार्श्वभूमीवर सिक्कीम सीमेवर भारत चीनमध्ये असलेला वाद चिघळत असल्याचे दिसून येत आहे. सिक्कीममधील जनतेने याआधी 1960 व 1970 मध्ये स्वतंत्र होण्यासाठी आंदोलने केली परंतु ती निर्दयीपणे चिरडण्यात आल्याचा हास्यास्पद दावाही चीनने केला आहे. भारताने 1975 मध्ये सिक्कीमच्या राजाला पदच्यूत केले आणि सिक्कीमला भारतात जोडले असा दाखला संपादकीयात देण्यात आला आहे.
भारत तिबेट व दलाई लामांचा विषय काढेल हे गृहीत धरून चिनी प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेकवेळा काढून झालेला आहे आणि आता त्यात नवीन भर टाकण्यासारखे काही नसल्याचा दावाही केला आहे. जर चीनने भारताशी असलेल्या संबंधांचा पुनर्विचार केला तर भारताला ते महागात जाईल अशी धमकी पुन्हा एकदा चीनने दिली आहे. 
काही दिवसांपूर्वी 1962 च्या युद्धाचा दाखला देत भारताने इतिहासापासून बोध घ्यावा अशी धमकी चीनने दिली होती.
 
आणखी वाचा
 
 
भारतामध्ये प्रवास करणाऱ्या चिनी प्रवाशांना ट्रॅव्हेल अॅलर्ट देण्याचा विचार करत असल्याचेही चीनने म्हटले आहे. 1890 मध्ये इंग्लंड व चीनमध्ये झालेल्या कराराचा भारत भंग करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. 
चीन सिक्कीम सीमेवरील डोंगलाँग या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता बांधत असून भारताने याला आक्षेप घेतला. या रस्त्यामुळे अतिपूर्वेकडील राज्यांमध्ये असणारी दळणवळण यंत्रणेवर विपरीत परिणाम होईल अशी भीती भारताने व्यक्त केली. तर, चीनच्या दाव्यानुसार हा रस्ता चीन आपल्या अधिकारात असलेल्या भागात बांधत आहे. जर, सिक्कीम, भूतान व भारत या भौगोलिक तिठ्याजवळ चीनची दळणवळण व्यवस्था पोचली तर लष्करीदृष्ट्या चीन भारताच्या वरचढ ठरेल अशी भीती आहे. कारण या भागापासून चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा प्रांत जो अतिपूर्वेकडील राज्यांना उर्वरीत भारताशी जोडतो तो अत्यंत जवळ आहे. ही केवळ 27 किलोमीटर रुंदीची पट्टी असून ती जर युद्धाच्या फुफाट्यात सापडली तर अतिपूर्वेकडील राज्यांचा उर्वरीत भारताशी संपर्क पूर्णपणे बंद होईल.
या पार्श्वभूमीवर चीन व भारतातील सध्याची संघर्षमय स्थिती महत्त्वाची असून त्यात रोज प्रतिकूल घटनांची भर पडत आहे.