शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सिमकार्डसाठीही ‘आधार’सक्ती!

By admin | Published: March 27, 2017 4:47 AM

सध्याच्या सर्व मोबाइलधारकांना ‘आधार’वर आधारित ई-केवायसी करावी लागणार आहे. हे सत्यापन करण्यास दूरसंचार

नवी दिल्ली : सध्याच्या सर्व मोबाइलधारकांना ‘आधार’वर आधारित ई-केवायसी करावी लागणार आहे. हे सत्यापन करण्यास दूरसंचार कंपन्यांनी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. दूरसंचार सेवा देणाऱ्या आॅपरेटर्सची संघटना सीओएआयने म्हटले आहे की, आमच्या सदस्य कंपन्या याबाबत लवकरच एक बैठक घेतील. सध्याच्या एक अब्जपेक्षा अधिक मोबाइल ग्राहकांच्या सत्यापन प्रक्रियेसाठी या वेळी चर्चा करण्यात येईल. दूरसंचार विभागाने एका अधिसूचनेद्वारे सांगितले आहे की, सर्व लायसन्सधारक कंपन्यांनी सर्व ग्राहक (प्रीपेड आणि पोस्टपेड) यांचे ‘आधार’वर आधारित ई-केवायसीच्या माध्यमातून सत्यापन करावे. सर्व कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि एसएमएसद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची सूचना द्यावी लागेल. या प्रक्रियेची माहिती वेबसाइटवरही द्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीत एक आदेश दिला होता. यात न्यायालयाने म्हटले होते की, मोबाइल फोन ग्राहकांचा पत्ता आणि ओळख निश्चित करण्यासाठी एक प्रभावी प्रक्रिया विकसित झाली आहे. एक वर्षाच्या आत ही सत्यापन प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. (लोकमत न्यूज नेटवर्क)कंपन्यांना १ हजार कोटींचा खर्चदूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे की, यासाठी कंपन्यांनी अशी प्रक्रिया अवलंबवावी जेणेकरून लांब रांगांपासून दूर राहता येईल. याबाबत सीओएआयने म्हटले आहे की, दूरसंचार उद्योग या निर्णयाचे स्वागत करत आहे. पण, या प्रक्रियेसाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे व कंपन्यांना हा खर्च करावा लागणार आहे.  संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज म्हणाले की,  यामुळे बनावट ग्राहक समाप्त होतील. एक वर्षाच्या या काळात काम पूर्ण न झाल्यास आम्ही दूरसंचार विभागाला मुदत वाढवून मागू.