शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

"न्यायाधीशांनी घोड्यासारखे काम करावं अन् फेसबुकपासून दूर राहावं"; सुप्रीम कोर्टाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:35 IST

सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांना सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा आदेश जारी करून न्यायाधीशांना सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. न्यायमूर्तींनी साधु जीवन जगावे आणि घोड्यासारखे काम करावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोन महिला न्यायिक अधिकाऱ्यांच्या बडतर्फीच्या प्रकरणावर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. न्यायमूर्तींनी सोशल मीडियावर निर्णयाबद्दल कोणतेही मत व्यक्त करू नये, असं  सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

अदिती कुमार शर्मा आणि सरिता चौधरी या दोन महिला न्यायाधीशांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बडतर्फ केल्याच्या प्रकरणावर हा आदेश देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  बी.व्ही. नागरत्ना आणि ना. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीशांनी फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर पूर्णपणे टाळण्यास सांगितलं आहे.

महिला न्यायिक अधिकारी सरिता चौधरी यांना बडतर्फ केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिवक्ता आणि ॲमिकस क्युरी गौरव अग्रवाल यांनी अधिकाऱ्याविरोधातील विविध तक्रारींचा पाढा वाचला. त्या अधिकाऱ्याने फेसबुकवरही पोस्ट केल्याचे त्यांनी खंडपीठाला सांगितले. या तक्रारीशी संबंधित फाईल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी थांबवली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर न्यायमूर्ती  बी.व्ही. नागरत्ना यांनी न्यायाधीशांनी हे सर्व फेसबुकवर का पोस्ट केले, असा प्रश्न उपस्थित केला.

"या न्यायिक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर जाऊ नये.तसेच त्यांनी निकालावर भाष्य करू नये. न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयांवर सोशल मीडियावर भाष्य करू नये कारण भविष्यात हाच निर्णय संदर्भित केल्यास, त्यांच्या आधीच्या टिप्पण्यांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. न्यायिक अधिकारी आणि न्यायाधीशांना किती बलिदान द्यावे लागते ते पहा. त्यांनी फेसबुकवर हे सगळं घेऊन अजिबात जायला नको," असं  बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटलं. 

अदिती कुमार शर्मा आणि सरिता चौधरी यांच्या बडतर्फीची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दखल घेतली होती. अदिती शर्मा यांची २०१९-२० पासून कामगिरी सरासरी आणि वाईट झाली आहे. २०२२ मध्ये त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, अदिती शर्मा यांनी हायकोर्टात सांगितले की ती २०२१ मध्ये गर्भवती होती आणि त्यानंतर तिच्या भावाला कॅन्सर झाल्याचे निदान झालं होतं. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने न्यायिक अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित केली. न्यायालयाने असेही म्हटले आहे की कोविड -१९ मुळे न्यायालयीन कामाचे योग्य मूल्यांकन होऊ शकले नाही तरीही न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आले. त्यावर न्यायालयाने उच्च न्यायालयाला नोटीस बजावून या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सहा महिला दिवाणी न्यायाधीशांना बडतर्फ केल्याचीही सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली होती. कामगिरीच्या आधारे या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र ते योग्य पद्धतीने झाले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने या प्रकरणांचा पुन्हा आढावा घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयFacebookफेसबुकHigh Courtउच्च न्यायालय