शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 12:57 PM

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: श्रीरामजन्मभूमी वादाबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी नेमके काय झाले, याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केले.

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. श्रीराम दर्शनाची आस देशवासीयांना लागली आहे. यातच राम मंदिर निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया दिली. राम मंदिर निकालावर पाच सदस्यीय खंडपीठाचे एकमत कसे झाले, यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात चर्चेत असलेल्या जुन्या श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय दिला. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करून ट्रस्टकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारांना मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी ५ एकर जमीन देण्यास सांगितले. याबाबत एका मुलाखतीत बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सविस्तर भाष्य केले.

५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले?

साधारणतः जुन्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर अंतिम निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने, या खटल्याला विविध  दृष्टिकोनांचा, संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे. खंडपीठाचा भाग असलेल्या सर्वांनी ठरवले की, हा न्यायालयाचा निर्णय असेल. अयोध्या जमीन खटल्याच्या निकालाचा अंतिम परिणामच नव्हे, तर हा निकाल देण्याच्या कारणांमध्येही सर्वजण एकत्र असल्याचा स्पष्ट संदेश देण्यासाठी एकमुखी निकाल देण्याचे  सर्व न्यायाधीशांनी एकमताने निश्चित केले. या खटल्यास वादाची प्रदीर्घ पार्श्वभूमी होती आणि दोन्ही बाजूंना देशाच्या इतिहासाशी संबंधित टोकाची मते होती. अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी या निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता. कारण यामुळे हा निकाल कोणी लिहिला, त्या न्यायमूर्तींचे नाव समजणारच नाही, असे सीजेआय चंद्रचूड यांनी सांगितले. 

दरम्यान, राम मंदिर जन्मभूमीचा वादाची न्यायालयीन लढाई १३४ वर्षांपासून सुरू होती, असे सांगितले जाते. अयोध्या खटल्याचा निकाल देण्यासाठी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ तयार करण्यात आले होते. त्यात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नजीर आणि विद्यमान सरन्याधीश धनंजय चंद्रचूड होते.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड