शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलन सुटणार: सर्वोच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 06:30 IST

केंद्र सरकारने पेरारिवलनची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठविण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचे समर्थन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेतील अनुच्छेद १४२ अनुसार असाधारण अधिकाराचा वापर करून  बुधवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी ३० वर्षांपासून तुरुंगवासात असलेला ए. जी. पेरारिवलन याची सुटका करण्याचा आदेश दिला.

न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने म्हटले की, या हत्याकांडातील सर्व सात दोषींची मुदतपूर्व सुटका करण्यासंबंधीची तमिळनाडू राज्य मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांसाठी बंधनकारक होती. भादंवि कलम ३०२ अन्वये एखाद्या प्रकरणात  माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे, हा केंद्राचा युक्तिवादही सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावला. न्यायपीठाने म्हटले की, अनुच्छेद  १६१ ला (माफ करण्यासंबंधीचा राज्यपालांचा अधिकार) निष्प्रभावी करील. न्यायपीठात न्या. बी. आर. गवई यांचाही समावेश आहे.

- राज्यघटनेतील अनुच्छेद १४२ चा वापर रामजन्मभूमी-बाबरी मशीद भूमी वाद प्रकरणातही करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा वापर करणे आणि प्रलंबित कोणत्याही प्रकरणात  पूर्ण न्याय करण्यासाठी आदेश संमत करण्याच्या अधिकाराशी संबंधित हा अनुच्छेद  आहे.

- यापूर्वी केंद्र सरकारने पेरारिवलनची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठविण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचे समर्थन केले होते.

- अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी म्हटले होते की, केंद्रीय कायद्यानुसार दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीला माफ करणे, त्याच्या शिक्षेत बदल करणे व दया याचिकांवर राष्ट्रपतींच निर्णय घेऊ शकतात.

- सर्वोच्च न्यायालयाने ९ मार्च रोजी पेरारिवलन याला जामीन दिला होता. बहुशिस्तपालन निगराणी संस्थेची (एमडीएमए) चौकशी पूर्ण होईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्यात यावी, अशी विनंती पेरारिवलनने केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत होते.

सीबीआयने २० नोव्हेंबर २०२० रोजी प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की,  तमिळनाडूच्या राज्यपालांना पेरारिवलनला सूट देण्याचा निर्णय घ्यायचा आहे. यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे नाही, असे स्पष्ट करून राज्यपालांनी दयेची याचिका राष्ट्रपतींकडे पाठविली होती. तेव्हापासून ही याचिका प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, फैसला होईपर्यंत जामीन देणार नाही.

माजी पंतप्रधानांच्या हत्याकांडाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने ‘एमडीएमए’ने मोठ्या कटाच्या चौकशीची शिफारस केली होती.  न्या. एम. सी. जैन चौकशी आयोगाच्या शिफारशींवर करण्यात आली होती.

दि. २१ मे १९९१ रोजी एका निवडणूक रॅलीदरम्यान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्या वेळी एक महिला आत्मघाती हल्लेखोराने स्फोटाने स्वत:ला उडवून दिले होते. यात हल्लेखोर धनू सह १४ जण ठार झाले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRajiv Gandhiराजीव गांधी