शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

लालूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; पहिल्यांदाच निवडणूक प्रचारापासून लांब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 13:00 IST

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे.

नवी दिल्ली : चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. लालू प्रसाद यादव यांनी प्रकृतीचे कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी त्यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव 1977 सालानंतर पहिल्यांदाच आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहणार आहेत. 

मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी लालू प्रसाद यादव हे गेल्या 8 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी विशेष सुविधा दिली जात आहे. तसेच, त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे लालू प्रसाद यादव 1977 सालानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकणार नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पार्टीसाठी प्रचार केला होता.

'जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं,' विरहाने व्याकूळ राबडीदेवींनी रचली कविता   बिहारच्या राजकारणाचे केंद्र मानले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव सध्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांनंतर प्रथमच बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये लालूप्रसाद यादव यांचा सहभाग दिसणार नाही. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी आपल्या मनातील व्यथा कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

तेजप्रताप-तेजस्वी वादामुळे लालूप्रसादांच्या घरात यादवी; लालू-राबडी मोर्चाची स्थापना लालुप्रसाद यादव यांच्या तेजस्वी व तेजप्रताप या दोन मुलांचे आपसात अजिबात पटत नाही, हे आता उघडचे झाले आहे. आपले बंधू तेजस्वी यांच्या आसपास चापलुसांची संख्याच मोठी आहे, ते सारे बॅक्टेरिया आहेत. असे सांगून पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उतरवण्याचे तेजप्रताप यांनी जाहीर केले आहे. तेजप्रताप हे लालुप्रसादांचे मोठे पुत्र आहेत. पण पक्षाची सारी सुत्रे तेजस्वी यादव यांच्याकडे आहेत. कदाचित त्याचा रागही तेजप्रताप यांना असावा, असे समजते. तेजप्रताप म्हणाले की, दात खराब झाले की, डॉक्टर इंजेक्शन देतात, बॅक्टेरिया काढून टाकतात. तसेच पक्षात निर्माण झालेले चापलूस, बॅक्टेरिया यांना संपवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. तेजप्रताप यांनी लालू-राबडी मोर्चा नावाची संघटनाच स्थापन केली आहे. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवSupreme Courtसर्वोच्च न्यायालय