शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सुप्रीम कोर्टाचा आप सरकारला दणका!

By admin | Published: July 09, 2016 2:46 AM

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य वादाबाबतच्या याचिकेवर सुनावणीला नकार देऊन आप सरकारला दणका दिला. घटनेच्या कलम २३९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांची

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य वादाबाबतच्या याचिकेवर सुनावणीला नकार देऊन आप सरकारला दणका दिला. घटनेच्या कलम २३९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांची व्याप्ती स्पष्ट करावी, अशी मागणी करणारी याचिका आप सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सुनावणी करून निर्णय राखून ठेवला. तेव्हा आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्र व राज्य वाद उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतात का, हा मुद्दा आधी सोडवावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाला द्यावेत. उच्च न्यायालयाला आमच्या मुद्द्यांबाबत निर्णय देण्यापासून रोखावे व सर्वोच्च न्यायालयाने आमच्या अधिकारांची व्याप्ती स्पष्ट करावी, अशी मागणी आपने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीस नकार देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आमच्याकडे या, असे दिल्ली सरकारला सुनावले. उच्च न्यायालयाला घटनात्मक मुद्द्यावर निर्णय देण्याचे अधिकार आहेत, असे सांगून न्या. दीपक मिश्रा आणि यू.यू. ललित यांनी आप सरकारची याचिका निकाली काढली. दिल्ली सरकारच्या वतीने बाजू मांडताना विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी घटनात्मक तरतुदींचा ऊहापोह केला. दिल्लीत लोकनियुक्त सरकार असून, मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार लेफ्टनंट गव्हर्नर यांना प्रशासन चालवावे लागते, हा या न्यायालयाचा निर्णय या प्रकरणात लागू होतो, असे नमूद करताना या वादावर केवळ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते, असे जयसिंग यांनी नमूद केले. त्यावर खंडपीठ म्हणाले की, तुम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा का ठोठावला? तुम्ही घटनेच्या कलम २२६ अन्वये दिल्ली उच्च न्यायालयात गेला. आता उच्च न्यायालयाने या प्रकरणीचा निकाल राखून ठेवला. प्रत्येक न्यायालयाला त्याचे अधिकार क्षेत्र ठरविण्याचा अधिकार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘आप’च्या आणखी एका आमदारावर गुन्हाआम आदमी पार्टीचे (आप) देवळीचे आमदार प्रकाश जारवाल यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ग्रेटर कैलास पोलीस ठाण्यात जारवालविरोधात सदर महिलेने बुधवारी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जारवाल यांनी मला वाईट वागणूक देत माझा विनयभंग केला. आपचे आणखी एक आमदार दिनेश मोहनिया यांच्यावर त्यांनी महिलेवर हल्ला केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.