शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडून देण्यातील अडसर दूर, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 04:28 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या ए. जी. पेरारीवलन, मुरुगन आणि सन्थान या कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यास आक्षेप घेणारी गेली पाच वर्षे प्रलंबित असलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्याने या तिघांच्या मुक्ततेमधील अडसर दूर झाला आहे.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या ए. जी. पेरारीवलन, मुरुगन आणि सन्थान या कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यास आक्षेप घेणारी गेली पाच वर्षे प्रलंबित असलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्याने या तिघांच्या मुक्ततेमधील अडसर दूर झाला आहे.श्रीपेरम्बदूर येथील स्फोटात राजीव गांधी यांच्यासह १६ जणांचा मृत्यू झाला होता. याआधीही त्यावेळच्या जयललिता सरकारने या तिन्ही मारेकऱ्यांना सोडण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतला होता. मरण पावलेल्या इतरांपैकी सहा जणांच्या कुटुंबीयांनी त्याविरुद्ध केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती.ही याचिका गुरुवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा या कैद्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी आता ही याचिका निरर्थक झाली असल्याचे निदर्शनास आणले. त्यांचे म्हणणे होते की, २०१४ च्या मुक्ततेच्या निर्णयास केंद्र सरकारने आक्षप घेतला होता. केंद्राच्या तपास यंत्रणेने अभियोग चालविलेल्या खटल्यातील कैद्यांना राज्य सरकार, केंद्राच्या संमतीविना परस्पर सोडू शकत नाही, असे केंद्राचे म्हणणे होते. नंतर हा विषय घटनापीठाकडे गेला. घटनापीठाने केंद्राच्या बाजूने निकाल दिला. तामिळनाडू सरकारने त्यानंतर केंद्राकडे संमती मागितली; पण ती नाकारली गेली.त्याविरुद्ध तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली व न्यायालयाने राज्यपाल हा निर्णय घेऊ शकतात, असा निकाल दिला. आता नव्याने निर्णय घेण्यात आल्याने २०१४ चा निर्णय व त्यास दिलेले आव्हान निरर्थक झाले आहे. अ‍ॅड. शंकरनारायणन यांचा हा युक्तिवाद मान्य करून खंडपीठाने प्रलंबित याचिका निकाली काढली.काय आहे प्रकरण ?हे तिन्ही खुनी गेली २८ वर्षे कैदेत आहेत. त्यांना मुळात फाशीची शिक्षा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने विलंबाच्या कारणाने फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप दिली. कैद्यांना मुदतपूर्व सोडण्याच्या दंड प्रक्रिया संहितेमधील तरतुदीचा आधार घेत तामिळनाडू सरकारने गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी या तिघांना सोडून देण्याचा निर्णय घेतला. तसा औपचारिक आदेश काढण्यासाठी प्रकरण राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पाठविले गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने राज्यपालांनी त्यावर अद्याप कारवाई केली नव्हती. आता तो अडसर दूर झाला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRajiv Gandhiराजीव गांधी