शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सर्वोच्च न्यायालय ही तर सर्वात बेशिस्त जागा; न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 06:23 IST

भूषण गवई हे मे महिन्यात होणार सरन्यायाधीश

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय ही सर्वांत बेशिस्त जागा आहे अशी टीका त्या न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केली आहे. मी मुंबई उच्च न्यायालय, या न्यायालयाचे औरंगाबाद, नागपूर खंडपीठ येथेही काम केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाइतके बेशिस्त वातावरण मी कुठेही पाहिलेले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 

विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे येत्या मे महिन्यात निवृत्त होत असून त्या पदावर गवई हे विराजमान होणार आहेत. गवई यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील वातावरणाची तुलना केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील दालनात सहा वकील एका बाजूला तर सहा वकील दुसऱ्या बाजूला बसलेले असतात. एकाच वेळी सर्वजण हे बोलत असतात. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होते. 

उच्च न्यायालयात काम करताना असे दृश्य मला कधीही पाहायला मिळाले नाही. न्यायालयीन कामकाजात अडथळे आणणाऱ्या वकिलांबाबत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली.  (वृत्तसंस्था)

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होते तेव्हा तिथे असलेले वातावरण त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवलेले नसते. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना कोणीही कधीही बोलत असतो. या न्यायालयात अतिशय बेशिस्तीचे वातावरण असते. - भूषण गवई, न्यायमूर्ती 

मे महिन्यात गवई होणार सरन्यायाधीश

विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त झाल्यानंतर खन्ना हे या पदावर विराजमान झाले होते. खन्ना यांच्या निवृत्तीनंतर सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण गवई विराजमान होतील.

सरन्यायाधीशपदी अनुसूचित जातीतील पहिली व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती के. जी. बालकृष्ण होते. त्या प्रवर्गातील सरन्यायाधीशपदी दुसरी व्यक्ती विराजमान होण्याचा मान न्यायमूर्ती भूषण गवई यांना मिळणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय