शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एकदा वक्फ झाले की, विषय संपला...सर्वोच्च न्यायालयाचे हे 3 निर्णय चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:15 IST

Supreme Court judgements Waqf Amendment Act 2025: केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ कायद्याविरोधात अनेक विरोधीपक्ष आणि मुस्लिम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Supreme Court on Waqf Amendment Act 2025: लोकसभा आणि राज्यसभेत पास झाल्यानंतर वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. त्यानंतर आता देशात वक्फ कायदा लागू झाला आहे. पण, आता या कायद्याच्या वैधानिकतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांच्यासह किमान दहा व्यक्ती किंवा संघटनांनी या कायद्याविरोधात देशातील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिका दाखल करणाऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा युक्तिवाद असा आहे की, हा कायदा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयांचे उल्लंघन आणि मुस्लिमांचे मूलभूत आणि धार्मिक अधिकार हिरावून घेण्याचे षडयंत्र आहे. याचिकाकर्ते पुन्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या त्या टिप्पणीचा पुनरुच्चार करत आहेत, ज्यात एससीने म्हटले होते- 'एकदा वक्फ झाले की, विषय संपला.' दरम्यान, वक्फबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले तीन निर्णय महत्त्वाचे आहेत.

पहिला – रतीलाल पानचंद गांधी विरुद्ध द स्टेट ऑफ बॉम्बे (1954)

1954 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय देशातील धार्मिक स्वायत्ततेचे महत्त्व अधोरेखित करणारा होता. या निर्णयात न्यायालयाने 1950 च्या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्यातील काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या होत्या. धर्मनिरपेक्ष संस्थेला धार्मिक मालमत्तेचे नियंत्रण देणे, हे त्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या धार्मिक आणि मालमत्ता अधिकारांवर अतिक्रमण आहे, असे न्यायालयाने तेव्हा म्हटले होते. हा निर्णय आधार मानून वक्फ मालमत्तेवर सरकारचे नियंत्रण वाढवणे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर तपासाची व्यवस्था करणे, हे 1954 च्या या निर्णयाचे उल्लंघन आहे, असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात केला जात आहे.

दुसरा - सय्यद अली विरुद्ध आंध्र प्रदेश वक्फ बोर्ड हैदराबाद (1998)

1998 च्या या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने वक्फला इस्लाम धर्माअंतर्गत धर्मादाय करण्याची पद्धत मानली होती. ही व्यवस्था कुराणातून आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. या निर्णयात न्यायालयाने वक्फचा वारसा मान्य केला होता. मुस्लीम कायद्यांमध्ये वक्फ हे पवित्र आणि धार्मिक स्वरूपाचे दान असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने वक्फ कायमस्वरुपी मानला होता. वक्फ संपत्ती घोषित झाल्यानंतर ती वक्फच राहील, असे न्यायालयाने तेव्हा म्हटले होते.

तिसरा - के. नागराज विरुद्ध आंध्र प्रदेश (1985)

ही बाब आंध्र प्रदेश सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयाशी संबंधित होती. त्याचा थेट वक्फशी संबंध नव्हता, पण त्याचा आधार नक्कीच बनवला जात होता. मूळ कायद्याचा उद्देश निष्प्रभ ठरणाऱ्या अशा कोणत्याही सुधारणा घटनाबाह्य मानल्या जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात म्हटले होते. आता न्यायालयात असा युक्तिवाद केला जात आहे की, नवीन कायद्यातील किमान 35 दुरुस्त्या 1995 च्या वक्फ कायद्यातील तरतुदींच्या वास्तविक उद्देशाचे उल्लंघन करत आहेत.

 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय