शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

गोरक्षकांना आवरा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधिकारी नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 4:18 AM

गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हाती घेऊ दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत, सर्वोच्च न्यायालयाने गोरक्षकांकडून होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिका-याची नेमणूक करावी, असे आदेश दिले.

नवी दिल्ली : गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हाती घेऊ दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत, सर्वोच्च न्यायालयाने गोरक्षकांकडून होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिका-याची नेमणूक करावी, असे आदेश दिले.सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अमिताभ रॉय व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी काय पावले उचलली, याचा तपशील सादर करावा, असेही निर्देश राज्यांना दिले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हरयाणाने ही सूचना मान्य करून, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी ‘नोडल आॅफिसर’ म्हणून नेमण्याची तयारी दर्शविली.उपद्रव थांबविण्यासाठी काय केले?जनावरांची वाहतूक करणाºयांना अडवून गोरक्षकांकडून हिंसाचार केला जातो, हे लक्षात घेता, महामार्गांवरील हा उपद्रव थांबविण्यासाठी काय केले जाऊ शकेल, याचीही माहिती मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा करून सादर करावी, असेही न्यायालयाने सांगितले.काँग्रेस कार्यकर्त्या तहसीन पूनावाला व इतरांनी केलेल्या याचिकांच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आधीपासून आहेच. त्यात सहभागी होण्यासाठी महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. केंद्र सरकारने गोरक्षणाच्या नावाखाली होणारा हिंसाचार सर्वस्वी अमान्य आहे.पण हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने तो राज्य सरकारांनी हाताळायचा विषय आहे, अशी भूमिका घेतली होती. तेव्हा ‘तुम्हाला हिंसाचार रोखावाच लागेल’, असे सरन्यायाधीशांनी त्यांना सांगितले. या मुद्द्यावर केंद्रास भूमिका स्पष्ट करण्यास सांगून, पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय