शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘नीट’, ‘जेईई’ परीक्षा होणार ठरल्या वेळीच, तारखा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 05:57 IST

कोरोना महामारीचा जोर ओसरला नसल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी विविध राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी याचिका केली होती. ती फेटाळण्यात आली.

नवी दिल्ली: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) व ‘आयआयटीं’सह अन्य राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘जेईई’ या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिल्याने लाखो प्रवेशेच्छुक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अर्थात ‘एनटीए’ने दोन वेळा ठरलेल्या तारखा पुढे ढकलून परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले होते. कोरोना महामारीचा जोर ओसरला नसल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी विविध राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी याचिका केली होती. ती फेटाळण्यात आली.>लाखो उमेदवारांची नोंदणीपरीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यापासून देशभरातील नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ साठी तर सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. निर्बंध पाळून परीक्षा घेता याव्यात यासाठी ‘एनटीए’ने परीक्षाकेंद्रांची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. शिवायी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आधी निडलेले परीक्षाकेंद्र ऐनवेळी बदलण्याची मुभाही उमेवारांना देण्यात आली आहे.>परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे...विद्यार्थी त्यांच्यासोबत हँड सॅनेटायझर, मास्क, पाण्याची बाटली, पेन आणि पेन्सिल घेऊन जाऊ शकतात.आधीसारखेच कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे दागिने, कानातले घातला येणार नाहीत.कोणताही ड्रेसकोड नसेल. त्यामुळे ड्रेसकोड नाही म्हणून कोणत्याही केंद्रावर विद्यार्थ्याला अडवता येणार नाही.आता जेईईची परीक्षा सलग सहा दिवस १२ सत्रांमध्ये होईल.६ सप्टेंबर रोजी असलेल्या एनडीएच्या परीक्षेला बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना जेईईची परीक्षा देण्यात अडचणी येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांकडून २४ ते ३१ जुलैच्या काळात पुन्हा अर्ज मागवले होते. एनडीएच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना जेईईची परीक्षा सुरुवातीच्या टप्प्यात देता येणार आहे. त्यामुळे त्यांना एनडीएची परीक्षा देणे शक्य होणार आहे.जेईईच्या मुख्य परीक्षेसाठी ८.५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर नीटच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.>कोर्ट काय म्हणाले : महत्त्वाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे करियर टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही.एनईटीचे म्हणणे : कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून परीक्षा घेता येतील, याची खात्री करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.