शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जुन्या ५००, १००० रुपयांच्या नोटा बदलण्याची संधी पुन्हा मिळणार?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 14:36 IST

बनावट नोटा, काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली होती असं सांगत अ‍ॅटर्नी जनरल यांनी नोटाबंदीच्या अधिसूचनेचा कोर्टात बचाव केला

नवी दिल्ली : जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा पुन्हा बदलण्याची संधी मिळू शकते का? कदाचित हा प्रश्न तुम्हाला आश्चर्यचकित करेल. नोटाबंदीच्या सहा वर्षानंतर हे कसे शक्य होईल असं तुम्हाला वाटत असेल. पण सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे नजर टाकली तर ते अशक्य नाही. ठरविक मुदतीत ज्या व्यक्तींकडून जुन्या नोटा बदलून घेण्याची वेळ निसटली असेल त्यांनी केलेल्या अर्जांचा रिझर्व्ह बँकेने (RBI) विचार करावा असं नोटाबंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. 

काही प्रकरणांचा विचार केला जाऊ शकतोपाच न्यायाधीश न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, बी.आर. गवई, ए.एस. बोपण्णा, व्ही. रामसुब्रमण्यम आणि बी.व्ही. नगररत्न यांच्या खंडपीठाने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या ८ नोव्हेंबरच्या निर्णयाच्या वैधतेचा विचार करत आहेत. Live Law मधील वृत्तानुसार, भारताचे अ‍ॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी म्हणाले, नोटाबंदीच्या नोटा बदलण्याच्या तारखा वाढवता येणार नाहीत. परंतु ज्या अर्जदारांनी आवश्यक अटींची पूर्तता करून आणि सेंट्रल बँकेच्या विनाहरकत काही वैयक्तिक प्रकरणांचा रिझर्व्ह बँक विचार करेल. आरबीआयकडे आलेल्या ७०० अर्जांबाबत ते बोलत होते.

आता या याचिकांना काही अर्थ नाहीअ‍ॅटर्नी जनरल यांनी नोटाबंदीच्या अधिसूचनेचा कोर्टात बचाव केला. ते म्हणाले की, बनावट नोटा, काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली होती. रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ च्या नियमांनुसार नोटाबंदी लागू करण्यात आली होती, असं सरकारचं म्हणणं आहे. सहा वर्षांनंतरच्या याचिकांवर विचार करणं त्याला काहीही अर्थ नाही असं त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.

याचिकाकर्त्यांची मागणी काय?नोटाबंदीला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यांच्याकडे जुन्या नोटा पडून असल्याचं याचिकेत सांगण्यात आले. याचिकाकर्त्यांपैकी एकाने सांगितले की, त्याने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त जुन्या नोटा ठेवल्या आहेत. त्यावर न्यायालयाने सांगितले की, तुम्ही त्या जपून ठेवा. नोटाबंदीच्या वेळी ते परदेशात होते. नोटा बदलण्याची मुदत मार्चअखेरपर्यंत राहील असं सांगितले होते. परंतु मार्चपूर्वी बंद करण्यात आलं होतं असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDemonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक