शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

'चौकीदार चोर है' टीकेवरुन राहुल गांधी अडचणीत, सुप्रीम कोर्टाने बजावली अवमान नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 13:47 IST

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - चौकीदार चोर है या विधानावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. राफेल प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी आता कोर्टानेही म्हटलं चौकीदार चोर है असं विधान केलं होतं. याविरोधात भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींचे विधान हे कोर्टाचा अवमान असल्याने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुप्रीम कोर्टात राहुल गांधी यांनी आपण केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही त्यामुळे मीनाक्षी लेखी यांनी आक्षेप घेतला.  मंगळवारी याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी मीनाक्षी लेखी यांच्याकडून मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. 

राफेल प्रकरणात सुनावणीच्या दरम्यान भ्रष्टाचाराबाबत राफेलची लीक झालेली कागदपत्रे ग्राह्य धरली जातील असं सुप्रीम कोर्टाने सांगितले होतं. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना आता कोर्टानेही मानलं आहे की, चौकीदार चोर हे अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यांच्या या विधानावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानेही राहुल गांधी यांच्या विधानावरुन अवमान नोटीस पाठवली होती. त्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र नुसतं दिलगिरी व्यक्त करण्यावर भाजपाचं समाधान झालं नाही. राहुल गांधी यांनी दिलेल्या उत्तरामध्ये वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात सांगितले की, राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, आतापर्यंत राहुल गांधी यांनी दिलेलं उत्तर वाचलं नाही. मुकुल रोहतगी यांना राहुल गांधींनी दिलेलं उत्तर कोर्टात वाचून दाखवावं असं सरन्यायाधीशांनी सांगितले. 

हे उत्तर वाचून दाखवताना मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. राहुल गांधी आपली चूक झाल्याचं कबुल केलं मात्र या उत्तरात कुठेही माफी मागितली नाही. या दरम्यान सरन्यायाधीशांनी चौकीदार कोण आहे? असा प्रश्न मुकुल रोहतगी यांना केला. त्यावेळी रोहतगी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी पूर्ण देशाला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार चोर है, मात्र यावर सुप्रीम कोर्टाने कुठलीही टिप्पणी केली नाही. या प्रकरणावर सुनावणी पुढील 30 एप्रिल रोजी पुन्हा करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डीलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी