शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

Supriya Sule: आई-बाप काढू नका, सुप्रिया सुळेंनी केंद्रीयमंत्र्यांना थेट लोकसभेत सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 8:36 PM

सुप्रिया सुळेंनी जम्मू काश्मीरमधील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात भाष्य केलं. त्यावेळी, दिल्ली पब्लिक स्कूलचं उदाहरण त्यांनी दिलं

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेत महागाई आणि काश्मिरी पंडित या मुद्द्यांवरुन त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. काश्मिरी पंडितांच्या विषयावर बोलताना, 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मीरच्या पंडितांसाठी काय तरतूद केलीय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, येथील मुलांच्या शिक्षणासंदर्भातील प्रश्नावरुन त्यांच्यात आणि केंद्रीयमंत्री जितेंद्रसिंह यांच्या शाब्दीक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. 

सुप्रिया सुळेंनी जम्मू काश्मीरमधील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात भाष्य केलं. त्यावेळी, दिल्ली पब्लिक स्कूलचं उदाहरण त्यांनी दिलं. मात्र, त्या इतिहासामध्ये अडकण्याऐवजी आता आपण उपाययोजना केल्या पाहिजेत. जम्मू-काश्मीरमध्ये पाच हजार मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलला सरकारकडून नोटीसा पाठवल्या जात असून त्यांना त्रास दिला जातोय, हाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अशा नोटीसा पाठवून तुम्ही त्या राज्यातील मुलांचं भलं करत आहात का? किती दिवस आपण होऊन गेलेल्या घटनांबद्दल बोलणार. आपण इतिहासात अडकून न राहता भविष्याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत जुन्या गोष्टींचं न काढण्याचा, किंवा गत सरकारवर टीका करण्याऐवजी सध्याचं बोला, असा सूर सुळेंचा होता. याचदरम्यान, जितेंद्र सिंह यांनी जागेवरुन उठून सुप्रिया सुळेंनी वारसा किंवा इतिहास याबद्दल उदाहरण दिलं.  

माँ-बाप मत निकालिए

आम्ही नाही सांगणार आमच्या आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केलं असं त्यांनी म्हटलं. नाही सांगायचं तर नका सांगू. पण, तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला एवढं लायक बनवलं की, त्यांच्यामुळेच तुम्ही आज लोकसभेत आहात. आई-वडिलांमुळेच तुम्ही इथं पोहोचलाय, असे प्रत्युत्तर जितेंद्र सिंह यांनी दिलं होतं. त्यावर, पुन्हा सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तर तुम्हाला चालतं, मग आमच्याबाबतीत तुम्हाला काय अडचण आहे. फादर-मदर को छोड के कुछ बी बोल सकते है, माँ-बाप मत निकालिए.. असे म्हणत सुप्रिया सुळेंनी जितेंद्र सिंह यांना सुनावले. त्यावर, मंत्री जितेंद्र सिंह यांनी आपण ही गोष्ट पर्सनल घेऊ नका, वारसा आणि वडिलोपार्जित वारसा या संदर्भातने मी म्हटलं होतं, असे सिंह यांनी सांगितले.  

अर्थसंकल्पात काय तरतूद केली

खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासंदर्भात केंद्र सरकारवर कडक शब्दात टीका केली. पहिल्या सरकारने 60 वर्षात काय केलं, हा डायलॉग आता जुना झालाय. केवळ आर्टीकल 370 हटविल्याने काश्मिरी नागरिकांच्या आयुष्यात बदल घडत नाही. काश्मीरच्या महिला आणि मुलांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी काश्मीरमध्ये गंतवणुकीची गरज आहे, हे सत्य कोणीही नाकारत नाही. मात्र, जम्मू काश्मीरच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मिरी पंडितांसाठी काय तरदूत केली? असा सवालच सुप्रिया सुळेंनी लोकसभेत चर्चेदरम्यान उपस्थित केला. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभाJammu Kashmirजम्मू-काश्मीरEducationशिक्षण