शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Hathras Stampede : १२१ भाविकांच्या मृत्यूवर पहिल्यांदा बोलले भोले बाबा; म्हणाले, "त्या घटनेनंतर मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 08:55 IST

Bhole Baba : हाथरस दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना भोले बाबा यांनी आपण या घटनेने व्यथित झाल्याचे म्हटलं आहे.

Hathras Stampede :उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत १२० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर उत्तर प्रदेशपोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता पाच दिवसांनी 'भोले बाबा' म्हणजेच सूरजपाल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले आहेत. भोले बाबांनी हाथरस चेंगराचेंगरीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या घटनेबाबत भोले बाबा म्हणाले की, २ जुलै रोजी घडलेल्या घटनेने मी दु:खी आणि व्यथित आहे.

२ जुलै रोजी हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला. त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या अपघातावर शोक व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. याप्रकरणात आतापर्यंत बाबांच्या सेवेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे आता भोले बाबा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडले आहे.

हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेवर सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांनी एका व्हिडिओ निवेदनातून आपलं म्हणणं मांडले आहे. “२ जुलैच्या घटनेनंतर मी खूप दुःखी आहे. प्रभुने आम्हाला या दु:खावर मात करण्यासाठी शक्ती देईल यावर सर्वांचा विश्वास आहे. सर्वांनी सरकार आणि प्रशासनावर विश्वास ठेवा. गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे. मी माझे वकील ए.पी. सिंग यांच्यामार्फत समिती सदस्यांना विनंती केली आहे की, त्यांनी शोकग्रस्त कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी उभे राहून त्यांना आयुष्यभर साथ द्यावी,” असे भोले बाबा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सूरजपाल सिंग उर्फ ​​भोले बाबा आणि या प्रकरणातील सर्व आरोपींच्या कॉल रेकॉर्ड तपशीलांवर हाथरस चेंगराचेंगरीनंतर घडलेल्या घटनांचा क्रम पुन्हा तयार केला. चेंगराचेंगरी झाल्यामुळे सत्संग स्थळ सोडल्यानंतर  ​​भोले बाबा यांनी काय केले याबद्दल पोलिसांनी अनेक महत्त्वाचे तपशील उघड केले. चेंगराचेंगरी झाली जेव्हा अनेक लोक त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावत आले होते. चेंगराचेंगरीनंतर बाबा दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताफ्यातून निघून गेले. त्यानंतर भोले बाबा यांना त्यांचे मुख्य संयोजक देव प्रकाश मधुकर यांचा दुपारी २.४८ वाजता फोन आला आणि त्यांनी त्यांना चेंगराचेंगरीची माहिती दिली.  दुपारी ३ ते ४.३५ दरम्यान बाबांचे फोन लोकेशन त्यांच्या मैनपुरी आश्रमात सापडले. या प्रकारानंतर बाबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक फोन केले. त्यानंतर बाबांचा मोबाईल फोन ४,३५ नंतर बंद झाला आणि तेव्हापासून त्याचे लोकेशन सापडले नाही.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस