शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

आश्चर्यच! ज्या पक्षांनी ईव्हीएमवर घेतली होती शंका त्यांनीच केले कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 12:01 IST

EVM : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर बहुतांश पक्षांनी  आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. तसेच यापुढे मतदान मतपत्रिकेवर घेण्याचीही आग्रही मागणी केली होती. मात्र...

नवी दिल्ली - भारतात मतदानासाठी ईव्हीएमचा वापर गेल्या दोन दशकांपासून करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही काळापासून अनेक राजकीय पक्षांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर बहुतांश पक्षांनी  आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. तसेच यापुढे मतदान मतपत्रिकेवर घेण्याचीही आग्रही मागणी केली होती. मात्र आता एका संसदीय समितीने ईव्हीएममधील फेरफारीच्या शंका फेटाळून लावल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या समितीमध्ये ईव्हीएमविरोधात आघाडी उघडणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि बीएसपी या पक्षांच्या खासदारांचाही समावेश होता.

कार्मिक विभाग, कायदे आणि न्याय विभागाशी संबंधित समितीने आपला अहवाल शुक्रवारी राज्यसभेत सादर केला. यामध्ये बनावट मतदान बंद करणे, मतपत्रिकांच्या मोजणीसाठी होणारा विलंब आणि चुका दूर करण्यासाठी ईव्हीएमचे कौतुक करण्यात आले. तसेच तृणमूल काँग्रेस आणि बीएसपीच्या खासदारांचा सहभाग असलेल्या समितीने स्थानिक निवडणुकांमध्येही ईव्हीएमचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

मतदारांच्या सोईसाठी स्थानिक निवडणुकांमध्ये ही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात यावा, अशी शिफारस या संसंदीय समितीने राज्य निवडणूक आयोगांना केली आहे. तसेच या शिफारशींना विरोधी पक्षांच्या कुठल्याही सदस्याने विरोध दर्शवला नाही.  

तसेच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट आल्यामुळे मतदारांचा विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हता वाढली आहे. तसेच सुप्रीम कोर्टानेही मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारे मतदान घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

विविध कसोट्यांमुळे ईव्हीएम मशिनमध्ये खोटे करणे अशक्य

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत धक्का; भाजपा नेत्याला ईव्हीएमवर शंका 

लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत, प्रकरण सुप्रीम कोर्टात

या समितीचे अध्यक्षपद भाजपा खासदार भूपेंद्र यादव यांच्याकडे आहे. तसेच या समितीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि बसपाच्या खासदारांचाही समावेश आहे. याच पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, ईव्हीएमने केवळ निवडणूक प्रक्रियाच सुलभ केलेली नाही तर मतांची मोजणीसुद्धा वेगवान झाली आहे. तसेच ईव्हीएम  मतदारांसाठीसुद्धा सुविधाजनक आहे, असे या समितीने म्हटले आहे.

 

  

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनVVPATव्हीव्हीपीएटीParliamentसंसदtmcठाणे महापालिकाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी