शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 16:27 IST

सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट करत विविध मुद्दे उपस्थित करत आहेत.

ठळक मुद्देसुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनीही त्याच्या शवविच्छेदनावर सवाल उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यावर विषप्रयोग केल्यामुळे त्याचे शवविच्छेदन उशिरा करण्यात आले. जेणेकरून हे विष ठराविक काळानंतर पोटात विरघळून जाईल, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनीही त्याच्या शवविच्छेदनावर सवाल उपस्थित केला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये "आता सैतानी मारेकऱ्यांची मानसिकता आणि त्यांची मजल कुठपर्यंत गेलेली आहे, हे हळूहळू उघड होत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या पोटात विष विरघळून जावे आणि ते ओळखता येऊ नये, यासाठी त्याचे शवविच्छेदन जाणूनबुजून उशिरा करण्यात आले. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडण्याची ही वेळ आहे," असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह म्हणाले, "कोरोना काळात शवविच्छेदन करण्यास उशिर होऊ शकतो. मात्र, काहीतरी खाल्ल्यानतंर काही तास जिवंत असेपर्यंत ते रक्तात मिसळते. पण, या प्रकरणात मृत्यू काही तासांमध्ये झाला, त्यानंतर काय खाल्ले ते रक्तामध्ये जाऊ शकत नाही. अशावेळी शवविच्छेदन विलंबाचा फारसा परिणाम होत नाही. तरीही सुशांत सिंह राजपूतच्या पोटात काहीही सापडले नाही, असे शवविच्छेदन अहवालात येते. त्यामुळे हा शवविच्छेदन अहवाल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे."

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट करत विविध मुद्दे उपस्थित करत आहेत. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही महेश भट्ट यांच्याशी झालेल्या संभाषणाद्वारे अडचणीत येऊ शकते असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.

या पूर्वीच्या एका ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी विषप्रयोगाबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. या वेळी त्यांनी सुनंदा पुष्कर प्रकरणाचा उल्लेख केला. त्या प्रकरणात पोटात आढळलेल्या विषारी पदार्थामुळे ते प्रकरण उघड झाले. अशा प्रकारचा तपास अभिनेत्री श्रीदेवी आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात करण्यात आला नाही, असे सांगत असतानाच सुशांत सिंह राजपूतचा खून झाला, त्याच दिवशी अय्याश खान नावाचा ड्रग डिलर सुशांत सिंह राजपूतला कशासाठी भेटला? असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

आणखी बातम्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र     

धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपा