शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

“जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:07 IST

मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणुकीत जिंकलेल्या सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेता बनवण्यात आले. मात्र, भाजपचा झालेला पराभव सुवेंद अधिकाऱ्यांना पचलेला दिसत नाही. कारण, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजप पराभूत झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला होता. आता मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. (suvendu adhikari warns midnapore sp says do not do anything to risk of transfer to jammu kashmir)

ममता बॅनर्जी सरकार भाजप कार्यकर्त्यांना खोट्या आरोपांखाली फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुवेंदू अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच आपल्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीवर नाराजी व्यक्त करत मिदनापूरच्या पोलीस अधिक्षकांना धमकवल्याचे सांगितले जात आहे. तुम्हाला तुमची बदल जम्मू काश्मीरमधील अनंतनाग किंवा बारामुल्ला भागात व्हावी, असे वाटत नसेल, तर काहीही करू नका, अन्यथा धडा शिकवला जाईल, असा इशारा अधिकारी यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. 

रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Generic Aadhaar ची फ्रेंचायजी घ्या; गुंतवणूक छोटी, नफा मोठा!

माझ्या पाठीशी केंद्र सरकार आहे

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याचे सर्व कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. यात याच पोलीस स्थानकातून फोन केल्याचे दिसत आहे. तुम्हाला राज्य सरकारचा पाठिंबा असेल, तर माझ्या पाठीशी केंद्र सरकार आहे. भाजप कमकुवत आहे, असे समजू नका, या शब्दांत सुवेंदू अधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोंटाई येथील पोलीस स्थानकांना भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने ताडपत्री आणि मदत साहित्य चोरल्याचा आरोप केला आहे. याचीच चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

दरम्यान, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच भाजपचा पराभव झाला. आपले लक्ष्य ठरवत असताना जमिनीवर काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही सत्य परिस्थिती असून, यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत. पण यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला, असे सांगत अधिकारी यांनी स्वपक्षावर निशाणा साधला.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी