शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

‘गिळलेले’ काश्मीर आधी सोडा!

By admin | Published: October 02, 2015 4:19 AM

काश्मीर सैन्यमुक्त करण्याची नाहीतर पाकिस्तानला दहशतवादमुक्त करण्याची खरी गरज आहे, अशा सडेतोड शब्दांत खोऱ्यातील सैन्य हटविण्याची पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मागणी भारताने गुरुवारी फेटाळून लावली.

संयुक्त राष्ट्रे : काश्मीर सैन्यमुक्त करण्याची नाहीतर पाकिस्तानला दहशतवादमुक्त करण्याची खरी गरज आहे, अशा सडेतोड शब्दांत खोऱ्यातील सैन्य हटविण्याची पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मागणी भारताने गुरुवारी फेटाळून लावली. त्याचबरोबर पीओकेचा (पाकव्याप्त काश्मीर) अवैध ताबा पाकने लवकर सोडावा, असेही सुनावले. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेतील आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर थोड्याच वेळात दिल्लीहून भारताची तीव्र प्रतिक्रिया आली. शरीफ यांनी त्यांच्या भाषणात काश्मीर मुद्दा न सुटण्यास संयुक्त राष्ट्राचे अपयश संबोधले. त्याचबरोबर भारतासोबत शांततेसाठी ‘शांतता पुढाकार’ या चतु:सूत्रीचा प्रस्ताव ठेवला. या चतु:सूत्रीत काश्मीर सैन्यमुक्त करण्याच्या मागणीचा समावेश आहे. काश्मीर सैन्यमुक्त करणे हे उत्तर नाहीतर पाकिस्तान दहशतवादमुक्त करणे हे खरे उत्तर आहे. पाक हा दहशतवादाचा नाहीतर तो स्वत:च्या धोरणाचा मुख्य पीडित आहे, असे धारदार प्रत्युत्तर भारताचे परराष्ट्र सचिव विकास स्वरुप यांनी दिले. टष्ट्वीटमालिकेतून त्यांनी शरीफ यांच्या भाषणाची प्रचंड चिरफाड केली. पाक दहशतवादाचा मुख्य पीडित असल्याच्या शरीफ यांच्या वक्तव्याचा दुसऱ्या एका भारतीय अधिकाऱ्याने समाचार घेतला. पाकच दहशतवादाचा मुख्य पोशिंदा असून तो सरकारी धोरणाचे वैध शस्त्र म्हणून त्याचा वापर करतो, असे हा अधिकारी म्हणाला.संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी अभिषेक सिंह यांनी आमसभेदरम्यान उत्तर देण्याच्या भारताच्या अधिकाराचा वापर करताना म्हटले की, वस्तुस्थिती ही आहे की, तो (पाकिस्तान) दहशतवादाचे पालनपोषण करण्याच्या स्वत:च्या धोरणाचा बळी ठरला आहे. दहशतवादाचा उपयोग सरकारी धोरणाचे वैध शस्त्र म्हणून वापर करणारा देश याच्या केंद्रस्थानी आहे.याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटच्या मालिकेतून प्रत्युत्तर देताना म्हटले की, काश्मिरातून सैन्य काढून घेतल्यानंतर नाही तर पाकने दहशतवादाला मूठमाती दिल्याने तोडगा निघेल. त्यांनी टिष्ट्वटरवर असेही लिहिले, दहशतवाद्यांचे पालनपोषण केल्यामुळे पाकिस्तानात अस्थिरता निर्माण झाली असून, स्वत: निर्माण केलेल्या भस्मासुराचे शेजाऱ्यांवर खापर फोडणे हे समस्येवरील उत्तर नाही.(वृत्तसंस्था)‘पॅलेस्टिनी आणि काश्मिरी लोक परदेशींच्या ताब्याने पीडित असल्याच्या शरीफ यांच्या या टिपणीवर तिरकस प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वरूप म्हणाले की, पाकिस्तानी पंतप्रधानांचे परदेशी ताब्याचे वक्तव्य अगदी बरोबर आहे; परंतु ताबा करणाऱ्यांची नावे त्यांनी चुकीची सांगितली. पाकने पाकव्याप्त काश्मीर लवकरात लवकर रिकामा करावा, असे आवाहन आम्ही करतो. शरीफ यांनी जगभरातील मुस्लीम पीडित असल्याचे मत मांडताना काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली होती. पॅलेस्टीनी आणि काश्मिरी परदेशी ताब्याने पीडित असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर जोरदार हल्ला चढविताना अभिषेक सिंग यांनी अवैध ताबा करणारा पाकिस्तान असल्याचे सांगून भारत प्रलंबित मुद्द्यांवर पाकशी दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणात चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.