शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

UP Election 2022: “PM मोदींच्या रॅलीला गर्दी जमा करणे एवढेच CM योगी आदित्यनाथांचे काम राहिलेय का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 09:37 IST

UP Election 2022: उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय नेमणुकांबाबत योगी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. हळूहळू प्रचारसभांना वेग येत असून, सर्वपक्षीयांनी या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावल्याचे दिसत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हाच मुख्य अजेंडा या निवडणुकीसाठी विरोधकांचा असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे उत्तर प्रदेशमधील दौरे आणि प्रचारसभा वाढत चालल्या आहेत. यातच पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभांना गर्दी जमवणे एवढेच आता मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे काम राहिले आहे का, अशी थेट विचारणा करण्यात आली आहे. 

भाजपचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनीच आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. स्वामी चिन्मयानंद तीनवेळा भाजपच्या तिकिटावर यापूर्वी निवडून आले आहेत. स्वामी चिन्मयानंद यांनी फेसबुक पोस्ट लिहिली असून, यामध्ये योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. स्वामी चिन्मयानंद यांचा मुख्य रोख हा प्रधान सचिवांच्या नेमणुकीवर आहे. तसेच चिन्मयानंद यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला.

मोदींच्या रॅलीला गर्दी जमवणे एवढेच योगींचे काम राहिलेय का?

स्वामी चिन्मयानंद यांनी निवृत्त होत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या सेवेचा विस्तार करत त्यांना प्रधान सचिव केल्याबाबत योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान मोदी आता केंद्राच्या विविध विभागांप्रमाणे उत्तर प्रदेश शासनही यांच्याच जीवावर चालवणार का, असा सवाल स्वामी चिन्मयानंद यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रशासकीय स्तरावर केलेले बदल आश्चर्यकारक आहेत. प्रधान सचिवपदी नेमणूक करण्यासाठी अनेक योग्य अधिकारी प्रशासनात आहेत. मात्र, निवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्याचा सेवा विस्तार करून त्यांना प्रधान सचिव करणे कितपत योग्य आहे, अशी विचारणा चिन्मयानंद यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभा, रॅलींना गर्दी जमवणे एवढेच काम योगी आदित्यनाथ यांचे राहिले आहे का, असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी केला. 

आपल्या विधानाबाबत दिले स्पष्टीकरण

स्वामी चिन्मयानंद यांनी फेसबुक पोस्ट त्यांनीच लिहिल्याचे मान्य केले असून, निवृत्त अधिकाऱ्याला प्रधान सचिवपदी नेमणूक करण्याबाबत कोणताही आक्षेप नाही. या नेमणुकीला माझा विरोधही नाही. मी कोणत्याही व्यवस्थेचा विरोध केलेला नाही. मात्र, अन्य योग्य अधिकारी असतानाही निवृत्तीच्या केवळ दोन दिवस आधी सेवा विस्तार करून अशा प्रकारे नेमणुका होत असल्याबाबत मत मांडले आहे, असे स्पष्टीकरण स्वामी चिन्मयानंद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथprime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी