शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Taj Mahal: ‘ताजमहाल आमची प्रॉपर्टी, शाहजहाँनने आमच्या पॅलेसवर कब्जा केला’, भाजपाच्या महिला खासदारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 19:05 IST

Taj Mahal News: जयपूरच्या माजी राजघराण्याच्या प्रिंसेस आणि भाजपाच्या खासदार दीया कुमारी यांनी ताहमहाल ही आमची प्रॉपर्टी आहे. तो आमच्या कुटुंबाच्या पॅलेसच्या मालमत्तेवर उभा आहे. आमच्याकडे अशी कागदपत्रे आहेत, असा दावा केला आहे.

नवी दिल्ली - आग्रा येथील ताजमहालावर जयपूरच्या माजी राजघराण्याने आपला दावा सांगितला आहे. जयपूरच्या माजी राजघराण्याच्या प्रिंसेस आणि भाजपाच्या खासदार दीया कुमारी यांनी ताहमहाल ही आमची प्रॉपर्टी आहे. तो आमच्या कुटुंबाच्या पॅलेसच्या मालमत्तेवर उभा आहे. आमच्याकडे अशी कागदपत्रे आहेत, जी ताजमहाल हा जयपुरच्या माजी राजघराण्याचा एक पॅलेस होता, याला दुजोरा देतात. या पॅलेसवर पुढे शाहजहानने कब्जा केला.

दीया कुमारी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, जेव्हा शाहजहानने जयपूर राजघराण्याचा तो पॅलेज आणि जमीन घेतली होती. त्यावेळी मुघलांचं राज्य होतं. त्यामुळे त्यांना विरोध करणे शक्य नव्हते. आजसुद्धा कुठलेही सरकार कुठलीही जमीन अधिग्रहित करते तेव्हा त्याच्या बदल्यात नुकसान भरपाई दिली जाते. मात्र त्यावेळी असा कुठला कायदा नव्हता. त्यामुळे त्याबाबत दाद मागणे शक्य नव्हते. आता कुणीतरी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे.

दीया कुमारी यांनी सांगितले की, बंद खोल्या उघडून ताजमहाल हा आधी काय होता, याचा शोध घेतला गेला पाहिजे. ताज महाल तोडला पाहिजे, असं मी म्हणणार नाही. मात्र त्याच्या काही खोल्या उघडल्या पाहिजेत. त्यांनी सांगितले की, ताजमहालामधील काही खोल्या बंद आहेत. काही भाग दीर्घकाळापासून उघडलेले नाहीत. त्याची निश्चितच चौकशी झाली पाहिजे, तसेच ते उघडले पाहिजेत. त्यामुळे तिथे काय होते काय नव्हते हे सर्वांसमोर येईल. या सर्व दाव्यांची योग्य चौकशी झाल्यावरच याबाबतची निश्चित माहिती समोर येईल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Taj MahalताजमहालBJPभाजपाPoliticsराजकारण