शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

Rajnath Singh: तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 7:44 AM

Rajnath Singh: भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला. 

जम्मू : भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला. 

जम्मू विद्यापीठात आयोजित सुरक्षा परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी सरकारच्या काळात देशाने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केल्याचे सांगत त्यांनी २०१६च्या सीमेपलीकडील सर्जिकल स्ट्राईक व २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ल्याचा संदर्भ दिला. भारत पूर्वीसारखा राहिला नाही. तो अधिक शक्तिशाली होत आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. 

‘सर्जिकल स्ट्राईक’चानिर्णय केवळ दहा मिनिटांत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने दहशतवादाविरोधात प्रभावी कारवाई सुरू केली आणि पहिल्यांदाच देशालाच नव्हे तर जगालाही दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा अर्थ काय आहे हे कळले,’ असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अवघ्या १० मिनिटांचा अवधी घेतला, असेही ते म्हणाले. यावरून त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दिसून येते. 

आमच्या सैन्याने केवळ या बाजूने दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केले नाही, तर त्यांचा खात्मा करण्यासाठी ते सीमेपलीकडेही गेले, असे ते म्हणाले. तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  (वृत्तसंस्था)

‘भारताचे बोलणे जग लक्षपूर्वक ऐकते’n पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे. आज भारत बोलतो तेव्हा जग लक्षपूर्वक ऐकते, पूर्वी अशी परिस्थिती नव्हती, असे सिंह यावेळी म्हणाले.n सिंह यांचे हे वक्तव्य पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे. n या दौऱ्यांत अनेक ऐतिहासिक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. मोदींच्या वाढत्या विश्वासार्हतेचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की, एका देशाचे पंतप्रधान त्यांना ‘बॉस’ म्हणतात, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, मोदी इतके लोकप्रिय आहेत की लोक त्यांच्याकडून ऑटोग्राफ घेऊ इच्छितात.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत