शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

काश्मीरमध्ये निवडणुका घ्या, लगेचच राज्याचा दर्जा द्या; पंतप्रधान म्हणाले वेळ येताच निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:32 AM

वेळ येताच निर्णय घेऊ; पंतप्रधानांचे काश्मिरी नेत्यांना आश्वासन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, या प्रदेशाला लगेचच राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करा अशी मागणी काश्मीरी नेत्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यावर वेळ येताच केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन मोदी यांनी दिले.

राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केल्यानंतर तसेच जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकार प्रथमच काश्मीरी नेत्यांशी चर्चा करणार असल्याने गुरुवारच्या दिल्लीतील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुपकार गटातील सर्व नेते या बैठकीला हजर होते. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारुक अब्दुल्ला, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन, माकपचे नेते युसुफ तारिगामी, जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे नेते अल्ताफ बुखारी, जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रमुख जी.ए. मीर, भाजपचे रवींद्र रायना, पँथर्स पार्टीचे भीमसिंह आदी नेते उपस्थित होते.  तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हेही हजर होते. 

काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करा : काँग्रेस

काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा द्या, विधानसभा निवडणुका घ्या, अधिवास व नोकऱ्यांची हमी द्या, काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन करा, राजकीय कैद्यांची मुक्तता करा अशा पाच मागण्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केल्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर