शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

दहशतवाद्यांविरोधात तात्काळ कारवाई करा, नवाज शरीफांना आली जाग

By admin | Published: October 06, 2016 12:01 PM

भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अखेर जाग आली असून दहशतवाद्यावंरिोधात तात्काळ कारवाईचे आदेश लष्करला दिले आहेत

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 6 - भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अखेर जाग आली असून दहशतवाद्यावंरिोधात तात्काळ कारवाईचे आदेश लष्करला दिले आहेत. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा मलीन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर नवाज शरीफ सरकारने लष्करातील वरिष्ठ अधिका-यांना लवकरात लवकर जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. डॉन वृत्तपत्राने हे वृत्त दिलं असून यासंबंधी उच्चस्तरीय बैठक झाल्याची माहिती दिली आहे. 
 
(भारताकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन, नवाज शरीफांच्या उलट्या बोंबा)
  
मंगळवारी अधिका-यांची खासगी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी नवाज शरीफ सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि लष्करातील अधिकारी उपस्थित होते. लष्कर अधिका-यांना यावेळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. पठाणकोट हल्ल्याचा तपास पुर्ण करण्यासाठी तसंच रावळपिंडी न्यायालयात मुंबई हल्ल्यासंबंधी सुरु असलेला खटला लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 
  
(कबड्डी वर्ल्ड कपमधून पाकिस्तान आऊट)
(PoKमध्ये 'पाकिस्तानी दहशतवाद्यां'विरोधात निदर्शने)
 
या बैठकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री सहभागी होते. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अजीज चौधरी यांनी यावेळी प्रेझेंटेशन दिलं. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे संचालक रिझवान अख्तरही बैठकीत उपस्थित होते.