शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Afghanistan Taliban Crisis: तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 8:30 AM

भारतातून होणारी आयात-निर्यात तालिबानने थांबवली आहे.

ठळक मुद्देभारतातून होणारी आयात-निर्यात तालिबानने थांबवली लवकरच आयात-निर्यात सुरू करण्यावर भर दिला जाईलअफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली: तालिबानने अफगाणिस्तावर पूर्ण ताबा मिळवल्यानंतर आता तेथे सत्ता स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पळ काढल्यानंतर तालिबानने सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, एका पत्रकार परिषेदला संबोधित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. यातच भारतातून होणारी आयात-निर्यात तालिबानने थांबवली आहे. फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे डॉ. अजय सहाय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (taliban stopped import and export from india to afghanistan after crisis) 

सॅल्यूट! अमरावतीच्या ‘नीरजा’चे धाडस; तालिबानच्या तावडीतून १२९ भारतीयांना मायदेशी आणले

तालिबानने आताच्या घडीला आयात-निर्यात रोखली आहे. भारतातून अफगाणिस्तान होणारी आयात-निर्यात पाकिस्तानातून होत असते. मात्र, अफगाणिस्तावरील ताबा आणि आताची परिस्थिती यानंतर तालिबानने हा मार्ग बंद केला आहे. अफगाणिस्तानवरील सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. लवकरच आयात-निर्यात सुरू करण्यावर भर दिला जाईल, असे डॉ. अजय सहाय यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. 

तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

भारत आणि अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात

डॉ. अजय सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हा अफगाणिस्तानचा मोठा भागीदार आहे. सन २०२१ मध्ये भारतातून अफगाणिस्तानमध्ये ८३५ मिलियन डॉलरची निर्यात करण्यात आली. तर, अफगाणिस्तानमधून भारतात ५१० मिलियन डॉलरची आयात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर भारताने मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानात गुंतवणूक केली आहे. यामध्ये ४०० प्रकल्पांचा समावेश असल्याचे आहे. काही गोष्टी आंततरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण मार्गे निर्यात होत असून त्या सुरळीत आहेत. दुबईमार्गे होणारी आयातही सध्या सुरळीत आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये चहा, कॉफी, साखर, औषधे, मसाले यांची समावेश असून, आयातीमध्ये जास्त करून ड्राय फ्रूट्सचा समावेश आहे.

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

दरम्यान, अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत. अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये नवे पीक हाती येते. त्यावेळी भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सुकामेव्याची खरेदी होते. मात्र, सध्या अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत