शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

भाजपविरोधी पक्षांची ऐक्यासाठी चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू-राहुल गांधी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 07:02 IST

लोकसभेच्या २७२ जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्या पक्षाला अन्य लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस व मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत.

- हरिश गुप्ता/संतोष ठाकूरनवी दिल्ली - लोकसभेच्या २७२ जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्या पक्षाला अन्य लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस व मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत. तेलगू देसमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याला रवाना झाले.राजकीय निरीक्षक व सट्टा बाजाराने भाजपला २७२ हा जादुई आकडा गाठता येणार नाही, असे मत वर्तविले आहे. दुसरीकडे प्रसंगी अन्य पक्षांचा पाठिेंबा आम्ही मिळवू शकतो, असे भाजपचे सरचिटणीस राम मोहन व खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधक सावध झाले आहेत.राहुल गांधी व चंद्राबाबू यांच्यात काय चर्चा झाली, ते समजू शकले नाही. मात्र, सत्ताधारी रालोआमध्ये नसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी २३ मे रोजी सरकार स्थापनेसाठी एकत्र यावे, असा चंद्राबाबू यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने, त्या पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थिर सरकारसाठी प्रयत्न सुरू करावेत, अशी त्यांची इच्छा आहे.काँग्रेसने समाजवादी पक्षाशीही चर्चा सुरू केल्याचे समजते. प्रियांका गांधी यांनी सपचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची भेट घेऊ न त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, पण निवडणुकांनंतर सपने काँग्रेससोबत यावे, असे प्रियांका यांचे प्रयत्न आहेत. सप व काँग्रेस यापूर्वी एकत्र आले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र येण्यात अडचण येणार नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.उत्तर प्रदेशात सप व बसप तसेच राष्ट्रीय लोक दल यांची आघाडी असून, त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत. बसपच्या नेत्या मायावती काँग्रेससोबत उघडपणे येतील का, याविषयी शंका असली तरी सप व राष्ट्रीय लोक दल यांचा काँग्रेसला पाठिंबा मिळू शकेल, असे सांगण्यात येते.याशिवाय काँग्रेसचे नेते सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी पटनायक यांच्याशी चर्चा केल्याचे कळते. ओडिशामध्ये भाजपचे प्रस्थ वाढू देण्यापेक्षा काँग्रेसला पाठिंबा देणे बिजू जनता दलाला सोयीचे आहे. भाजपही त्यांच्या संपर्कात आहेत. चक्रीवादळानंतर तिथे पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी उघडपणे पटनायक यांचे कौतुक केले होते. तसेच ओडिशात मदत व पुनर्वसन कार्यासाठी एक हजार कोटीही त्यांनी जाहीर केले. पटनायक यांना खुश ठेवण्यासाठीच हे केल्याचे समजते.रेड्डी, रावनाही सोबत घ्यामतदान आटोपताच काँग्रेसने वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चंद्राबाबूंचे म्हणणे आहे. टीआरएसचे प्रमुख राव बिगरभाजप व बिगरकाँग्रेस प्रादेशिक पक्षांची आघाडीच्या प्रयत्नात आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूRahul Gandhiराहुल गांधी