शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

तामिळनाडूत 'अम्मा राज' येणार

By admin | Published: May 19, 2016 10:13 AM

अन्य राज्यांमध्ये खरा ठरलेला एक्झिट पोलचा अंदाज तामिळनाडूमध्ये मात्र चुकीचा ठरताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाला १३० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. १९ - अन्य राज्यांमध्ये खरा ठरलेला एक्झिट पोलचा अंदाज तामिळनाडूमध्ये मात्र चुकीचा ठरताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाला १३० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. द्रमुक-काँग्रेस आघाडीने २०११ च्या तुलनेत कामगिरीत सुधारणा केली असली तरी, ते सत्तेपासून दूर राहतील असेच चित्र आहे. 
 
जयललिता सरकारने जनतेसाठी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांना मतदारांनी मतपेटीतून  साथ दिली आहे. १९९१ पासून तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांमध्ये सत्तापालट होत राहिला आहे. पण यावेळी प्रथमच जयललिता सत्ता कायम टिकवतील असे दिसत आहे. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
 
जयललिता यांना खराब प्रकृतीमुळे यावेळी फारसा प्रचार करता आला नव्हता तसेच नोव्हेंबरच्या अखेरीस मुसळधार पावासामुळे तामिळनाडूत अनेक भागात पूर आला होता. त्यावेळी जनतेला पुरेशी सरकारी मदत मिळाली नसल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. या दोन मुद्यांचा जयललिता यांना फटका बसेल अशी शक्यता होती. 
 
 
मात्र मतमोजणीच्या आकडेवारीवरुन जयललिता मुख्यमंत्रीपद कायम टिकवतील असे दिसत आहे. विधानसभेतील सध्याच्या आकडेवारीनुसार अण्णाद्रमुकचे १६०, डीएमकेचे २३, काँग्रेसचे पाच, पीएमके दोन आणि डाव्यांचे १८ आमदार आहेत. भाजपने पक्ष विस्तारावर इथे लक्ष केंद्रीत केले होते. पण त्या तुलनेत यश मिळताना दिसत नाहीय. 
 
दोनवर्षांपूर्वी लोकसभा निवडणूकीत जयललिता यांनी क्लीनस्वीप विजयाची नोंद केली होती. त्यावेळी लोकसभेच्या ३९ जागांपैकी जयललिता यांच्या पक्षाने ३७ जागा जिंकल्या होत्या.जयललिता यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे.