शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:36 IST

टाटा समूहाच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन कारखान्यात भीषण आग लागली.

Tata Electronics Plant : तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत शनिवारी पहाटे भीषण आग लागली. स्फोटानंतर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीमुळे प्लांटचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. प्लांटच्या सेलफोन उत्पादन विभागात ही आग लागली. त्यानंतर प्लांटमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. कारखान्यात आग लागली तेव्हा सुमारे १,५०० कामगार कामावर होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोश्वासोच्छवासाचा त्रास होत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी १०० हून अधिक पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मोबाईल फोन ॲक्सेसरीजच्या पेंटिंग युनिटमध्ये ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे. टीईपीएल कंपनी ही  आयफोनसाठी वेगवेगळ्या ॲक्सेसरीज बनवते. या कंपनीत सुमारे ४,५०० कर्मचारी काम करतात. यामध्ये बहुतांश महिला आहेत. आगीनंतर युनिटमधून काळ्या धुराचे ढग निघत होते. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कृष्णगिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी थनागदुराई यांनी सांगितले की, आग लागली तेव्हा मोबाईल पॅनल पेंटिंग युनिटमध्ये काही कर्मचारी काम करत होते. या युनिटमध्ये रसायनांचा साठाही होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागली, त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले.  गुदमरल्यामुळे तीन कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

आगीनंतर घटनास्थळी सर्वत्र काळा धूर पसरला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीची जागा तात्काळ रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आग विझवण्यासाठी होसूर, कृष्णगिरी आणि जवळपासच्या अनेक अग्निशमन केंद्रातून सात अग्निशमन गाड्या मागवण्यात आल्या आहेत. आम्ही या भागात १०० हून अधिक पोलिस तैनात केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आयफोनसाठी अनेक उपकरणे तयार करणारी ही कंपनी ५०० एकरांवर पसरलेली आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूfireआगTataटाटा