शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

तामिळनाडूत 'रात्रीस खेळ चाले', पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी?

By admin | Published: February 08, 2017 6:47 AM

पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास आपण राजीनामा मागे घेऊ, असंही जाहीर केले, त्यानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप आल्याचे दिसून आले.

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 08 - अण्णाद्रमुकसाठी मंगळवार हा प्रचंड राजकीय उलथापालथीचा दिवस ठरला. रात्री उशिरा झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जयललितांच्या पक्षात शशिकला व पन्नीरसेल्वम असे दोन गट पडल्याचे दिसून आले. सोमवारी अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांची पक्ष विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काल रात्री पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडलं गेलं', असा आरोप केला. तसंच जनतेने आणि पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास आपण राजीनामा मागे घेऊ, असंही जाहीर केले, त्यानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप आल्याचे दिसून आले. पन्नीरसेल्वम यांच्या दाव्यानंतर शशिकलांनी लगेच पोएस गार्डनस्थित निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली. बैठकीनंतर शशिकला यांनी पक्षाच्या खजिनदार पदावरुन पनीरसेल्वम यांना हटवत त्यांच्याजागी डिंडीगुल श्रीनिवासन यांच्याकडे खजिनदार पद सोपवले आहे. तर पीटीआयच्या वृत्तानुसार पनीरसेल्वम यांनी पक्षाविरोधातील बंड थांबवावे अन्यथा त्यांना पक्षातून निलंबित करण्याच येईल असा इशारा शशिकला यांनी दिला आहे. या बैठकीत अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांसह बहुतांशी आमदार उपस्थित होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास शशिकला यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पनीरसेल्वम यांच्यावर निशाणा साधला. पक्षातील आमदारांमध्ये एकजूट असून पनीरसेल्वम यांना पक्षात ठेवता कामा नये अशी आमदारांनी भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितलेमी अण्णा द्रमुक पक्षाचा कट्टर समर्थक आहे, त्यामुळे प्रतीक्षा करा आणि उद्या काय होईल ते पाहा असे विधान पनीरसेल्वम यांनी रात्री उशीरा केले आहे. त्यामुळे पनीरसेल्वम यांच्या हलचालीकडे सर्वच देशाचे लक्ष लागले आहे. काल रात्री तामिळनाडूच्या राजकीकारणात विविध घटना घडल्या अण्णा द्रमुक पक्षाचे राज्यसभा खासदार व्ही मायत्रेयन यांनी ओ. पनीरसेल्वम यांच्यानिवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर विरोधी पक्ष डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी पनीरसेल्वम यांच्यावर दबाब आणि धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे अवाहन केले आहे. काल रात्री पक्ष कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांना कुठलीही माहिती न देता पन्नीरसेल्वम अचानक चेन्नईच्या मरीना बीचवरील एमजीआर मेमोरिअल येथे जयललिता यांच्या स्मारकासमोर जाऊन आत्मचिंतनाला बसले. ते किमान ४० मिनिटं डोळे मिटून बसले होते. त्यानंतर पत्रकारांना सामोरे जाताना त्यांनी पक्षातील नेत्यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितल्याने हा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट केला. मला मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. मात्र, नेहमी अपमानजनक वागणूक मिळत होती, असा खुलासाही यावेळी पन्निरसेल्वम यांनी केला.३३ वर्षे एखाद्या बरोबर राहणे ही मुख्यमंत्रिपदाची पात्रता ठरत नाही, अशी टीका जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी केली आहे. तसेच जयललिता यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसल्याचा आरोप ही त्यांनी केला.