शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 16:55 IST

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने १५५ कर्मचारी सदस्यांना त्यांना कंपनीतून बाहेर काढल्याच्या नोटिसा पाठवाव्या लागल्या आहेत.

Tiss Lyoffs : भारतातील प्रमुख सामाजिक विज्ञान संस्था टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (टीस) अचानक आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने शुक्रवारी त्यांच्या चार कॅम्पसमधील एकूण १५५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. यामध्ये ५५ शिक्षक कर्मचारी आहेत तर ६० शिक्षकेतर कर्मचारी आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याचे म्हटलं जात आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने गुवाहाटी कॅम्पसमधून सर्वात जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. गुवाहाटी कॅम्पसमधील शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. बडतर्फ केलेले कर्मचारी हे एक दशकाहून अधिक काळ संस्थेसोबत काम करत होते आणि ते सर्व कंत्राटी होते. मात्र कर्मचाऱ्यांना कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचे कारण टाटा एज्युकेशन ट्रस्टचे अनुदान मिळत नसल्याचे सांगण्यात आलं आहे. टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून अनुदान न मिळाल्यानेकर्मचाऱ्यांना पगारही देण्यात आलेला नाही.

शुक्रवारी,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांना करार समाप्त होत असल्याची पत्रे पाठवली होती. या पत्रातून कर्मचाऱ्यांना कळण्यात आले की त्यांच्या कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही आणि ३० जून २०२४ रोजी सेवा समाप्त होईल. त्यामुळे टाटा एज्युकेशन ट्रस्टने यापूर्वी निधी उपलब्ध करून दिलेले हे कर्मचारी अनेक वर्षांच्या सेवेनंतर बेरोजगार झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे कर्मचारी २००८ पासून संस्थेत आहेत. 

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने मुंबई कॅम्पसमधील २०, हैदराबादमधील १५, गुवाहाटी कॅम्पसमधील १४ आणि तुळजापूर कॅम्पसमधील ६ शिक्षकांना काढून टाकले आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्कूल ऑफ हॅबिटॅट स्टडीजमध्ये प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जुलै आहे. 

टॅग्स :TataटाटाAssamआसामMaharashtraमहाराष्ट्र