शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

TDP, JDU नं भाजपचं टेन्शन वाढवलं, आता JDS ला काय हवं? खुद्द एचडी कुमारस्वामींनीच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:49 IST

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (TDP) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनाइटेडने (JDU) काही महत्वाची मंत्रालये मागितल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच आता 'जेडीएस'नेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ला बहुमत मिळाले आहे. मात्र, यावेळी भाजपची इतर सहकारी पक्षांवरील निर्भरता वाढली आहे. कारण यावेळी भाजपला स्वबळावर बहुमतापासून (२७२) दूर राहावे लागले आहे. खरे तर भाजपला 2014 नंतर पहिल्यांदाच एकट्याच्या बळावर बहुमत मिळालेले नाही.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (TDP) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनाइटेडने (JDU) काही महत्वाची मंत्रालये मागितल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच आता 'जेडीएस'नेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अशी आहे जेडीएसची भूमिका? -जेडीएस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी, "आम्ही नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. माझ्या शिवाय संपूर्ण देशालाच पंतप्रधान मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत," असे म्हटले आहे. एचडी कुमारस्वामी हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. यावेळी, युतीत सहभागी असलेले विविध पक्ष, विविध प्रकारच्या मागण्या करत आहेत. यासंदर्भात आपले काय म्हणणे आहे? असा प्रश्न केला असता, कुमारस्वामी म्हणाले, "काहीही मागणी नाही, देशाला स्थिर सरकार हवे आहे." 

खरे तर एनडीएकडे 293 खासदार आहेत. हा आकडा 543 सदस्यांच्या लोकसभेसाठी आवश्यक असलेल्या 272 पेक्षा अधिक आहे. एकट्या भाजपकडे 240 जागा आहेत. तसेच, एनडीएतील टीडीपीकडे 16, तर जेडीयूकडे 12 जागा आहेत. ज्या अत्यंत आवश्यक आहेत. याशिवाय, जेडीएसकडे 2 खासदार आहेत आणि काही इतर.

काय आहे टीडीपीची मागणी? -माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीने 6 मंत्रालये मागितली आहेत. ते 5 वरही राजी होण्यास तयार आहेत. याशिवाय, त्यांना लोकसभा अध्यपदही हवे आहे. 

जेडीयूला काय हवं? - जेडीयूच्या एका नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षाला तीन मंत्रालये हवी आहेत. याशिवाय, नितीश कुमार रेल्वे, ग्रामीण विकास आणि कृषी यासारख्या मोठ्या मंत्रालयांची मागणी करू शकतात, असेही पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू