शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 20:22 IST

आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी संसदीय अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. गेल्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. परंतू यावेळी कोणाची वर्णी लागेल हे अद्याप एनडीएला ठरविता आलेले नाहीय. 

केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारने आपले काम सुरु केले आहे. दुसरीकडे लोकसभेचे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आपल्याकडेच कशी ठेवता येईल यासाठी भाजपा रणनिती आखण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहे. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी संसदीय अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. याला जेपी नड्डा, आश्विनी वैष्णव, किरन रिजिजू, लल्लन सिंह, चिराग पासवान आदी हजर होते. 

18व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनासंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक झाली. बैठकीत सभापती आणि उपसभापतीपदासाठी एनडीएच्या उमेदवारासह विरोधी पक्षातील घटक पक्षांना आपल्याबाजुने करण्यासाठी कशी रणनिती आखता येईल यावर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपासाठीलोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे ठेवणे खूप महत्वाचे आहे. एनडीएसाठी हे पद जिंकणे कमी जिकीरीचे नाहीय. गेल्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. परंतू यावेळी कोणाची वर्णी लागेल हे अद्याप एनडीएला ठरविता आलेले नाहीय. 

24 जूनपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊ शकते. 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. संसदेचे 8 दिवसांचे विशेष अधिवेशन 24 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार असल्याचे समजते आहे. 24 आणि 25 जून रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात नवीन खासदारांचा शपथविधी होऊ शकतो. 

तसेच गेल्या पाच वर्षांपासून उपाध्यक्ष पद रिक्त आहे. तसेच सभागृहात विरोधी पक्षनेता नव्हता. तो यावेळी इंडिया आघाडीला मिळणार आहे. उपाध्यक्ष पद रिकामे ठेवू नये म्हणून विरोधी पक्ष दबाव टाकू लागला आहे. उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याचा प्रघात आहे. परंतू, गेल्या सरकारमध्ये त्यांना देण्यात आले नव्हते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने सभापतीपदासाठी एनडीएला पाठिंबा देण्याचे उघडपणे मान्य केले आहे. परंतू टीडीपीने आपले पत्ते खोललेले नाहीत. यामुळे भाजप टेंशनमध्ये आहे.

भाजपाच्या इतिहासातच उत्तर...लोकसभेचे अध्यक्षपद भाजपाला का महत्वाचे आहे याचे उत्तर या पक्षाच्या इतिहासात लपलेले आहे. १९९८ मध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आले होते. परंतू काही महिन्यांतच ते अल्पमतातही आले होते. तेव्हाही टीडीपी एनडीएत होता. वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात टीडीपीने अध्यक्षपद मागितले होते. परंतू, भाजपाने ते न दिल्याने बाजी पालटली होती. तीन भीती आता भाजपाला आहे तर विरोधकांना आशेचा किरण दाखवत आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाlok sabhaलोकसभा