शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

ऐन सणासुदीच्या काळात कांदा आणणार ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:44 IST

खरीपाला उशीर : टंचाई निर्माण झाल्यामुळे होणार भाववाढ

ठळक मुद्देप्राप्त माहितीनुसार, भारतात कांद्याची मासिक गरज सरासरी १३ लाख टन आहे. खरिपाच्या हंगामास झालेल्या विलंबामुळे कांद्याचा विद्यमान साठा फार काळ पुरणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदा ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मानक संस्था क्रिसिलने जारी केलेल्या अहवालानुसार, खरीप हंगामास झालेला उशीर आणि इतर काही कारणांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, देशातील कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस पडला. अनेक ठिकाणी पाऊस पडलाच नाही. यामुळे कांद्याच्या लागवडीला उशीर झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नवा कांदा बाजारात यायलाही उशीर होईल. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात.

प्राप्त माहितीनुसार, भारतात कांद्याची मासिक गरज सरासरी १३ लाख टन आहे. खरिपाच्या हंगामास झालेल्या विलंबामुळे कांद्याचा विद्यमान साठा फार काळ पुरणार नाही. त्यातच तौक्ते चक्रीवादळानेही कांद्याचे नुकसान केले आहे. इतरही काही कारणांमुळे कांदा महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. क्रिसिलने म्हटले की, ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणात ९ टक्क्यांची घट झाली आहे. कांद्याच्या उत्पादनात ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तथापि, ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे उत्पादन बाजारात येईल. त्या आधीच कांद्याच्या दरात वाढ होईल.

२०१८ च्या तुलनेत दर होतील दुप्पट २०१८ च्या तुलनेत यंदा कांद्याचे दर १०० टक्क्यांनी (दुप्पट) वाढू शकतात. यंदा खरीप हंगामात कांद्याची घाऊक किंमत ३० रुपयांच्या पुढे जाऊ शकते. गेल्या वर्षी हा दर थोडा कमी होता. २०१८ हे कांद्याच्या दरांसाठी सामान्य वर्ष मानले जाते. यानंतर कांद्याचा दरात सतत वृद्धी होत आहे. २०२० मध्ये देखील कांद्याचे दर २०१८ च्या तुलनेत दुप्पट झाले होते.

टॅग्स :onionकांदा