शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो'; तेजस्वी यादवांचा पंतप्रधानांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 19:07 IST

INDIA Allaince Maharally: अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची महारॅली दिल्लीच्या रामलीला मैदानावर घेण्यात आली. त्यातून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले. 

नवी दिल्ली - Tejasvi Yadav on BJP ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीनिमित्त देशात सध्या प्रचाराला वेग आला आहे. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीत विरोधी पक्षांनी लोकतंत्र बचाओ महारॅलीचं आयोजन केले. त्यातून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राजधानी दिल्लीत रामलीला मैदानात राहुल गांधींनी मोदींवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी सत्ताधाऱ्यांवर द्वेषाचं राजकारण करत असल्याची टीका केली. 

तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही देशात कुठेही जात आहोत तिथे आम्हाला जनतेचं समर्थन मिळत आहे. देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. आम्ही पहिली पटणा, मग मुंबई आणि आता तिसरी रॅली दिल्लीत करत आहोत. भाजपा सरकार ज्यारितीने देशाचं विभाजन करत आहे, द्वेषाचे राजकारण करत आहे त्याविरोधात होणाऱ्या लढाईत तुम्ही आम्हाला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच लोकशाहीत जनता मालक आहे. अबकी बार ४०० पार बोलणारे तोंडावर पडणार आहेत. देशात बेरोजगारी, महागाई, गरिबी हे शत्रू आहेत. मागील काळात मोदींनी सर्व गोष्टींचे खासगीकरण केले. आम्ही १७ महिन्यात बिहारमध्ये ५ लाख लोकांना रोजगार देण्याचं काम केले. आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. युवक त्रस्त आहे परंतु पंतप्रधानांना शेतकऱ्यांना भेटण्याचाही वेळ नाही. मोदी प्रियंका चोप्रा यांना भेटतात, पण शेतकऱ्यांना नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं. 

"तूम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो"

तेजस्वी यादव यांनी या महारॅलीत सरकारने लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही केली नसल्याचा आरोप केला. यासाठी तेजस्वी यादवांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाणं, तू तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो असं म्हणत केंद्रीय तपास यंत्रणांकडून ईडी, सीबीआय कारवाईमागे भाजपा असल्याचं सांगितले. आम्ही घाबरणारे नाही. ज्यारितीने हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल यांना अटक केली गेली. आम्ही वाघ आहोत संघर्षातून मागे हटणार नाही असा इशारा तेजस्वी यादवांनी दिला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालTejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी