शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 06:45 IST

Telangana Assembly Election:निवडणूक आयाेगाने तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला झटका दिला आहे. ‘रायथू बंधू’ याेजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यता निधीचा हप्ता वितरित करण्यास दिलेली परवानगी आयाेगाने मागे घेतली आहे.

नवी दिल्ली - निवडणूक आयाेगाने तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला झटका दिला आहे. ‘रायथू बंधू’ याेजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यता निधीचा हप्ता वितरित करण्यास दिलेली परवानगी आयाेगाने मागे घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांकडून या याेजनेचा प्रचारात उल्लेख हाेत असून, हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे आयाेगाने म्हटले आहे. आचारसंहिता लागू असेपर्यंत याेजनेंतर्गत काेणताही हप्ता जारी करण्यात येऊ नये, असे आयाेगाने आदेशात स्पष्ट केले आहे.राज्याचे अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी एका प्रचारसभेत याबाबत जाहीर घाेषणा केली हाेती. तसेच पक्षाच्या इतर नेत्यांनीही प्रचारात पैसे खात्यात जमा हाेणार असल्याचा उल्लेख केला हाेता. आयाेगाने परवानगी देताना प्रचारात हा उल्लेख न करण्याचे स्पष्ट केले हाेते. यासंदर्भात काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार  केली होती.

शेतकरी कदापि माफ करणार नाही : काॅंग्रेसबीआरएसचा बेजबाबदारपणा आणि संकुचित दृष्टिकाेनामुळे आयाेगाने निर्णय घेतला. बीआरएसने हे आणखी एक पाप केले असून, त्यांना शेतकरी कदापि माफ करणार नाहीत. हा पैसा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे, असे काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगाेपाल यांनी सांगितले.

हे तर घाणेरडे राजकारण : कवितापरवानगी मागे घेण्यामागे काँग्रेससारख्या जुन्या पक्षाचे घाणेरडे राजकारण जबाबदार असल्याची टीका बीआरएसच्या नेत्या व आमदार के. कविता यांनी केली. शेतकऱ्यांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि काँग्रेस शेतकऱ्यांचा शत्रू आहे, हे सत्य जाणून घ्यावे, असे कविता  यांनी सांगितले. 

काय म्हणाले हाेते हरीश राव?हरीश राव म्हणाले हाेते की, साेमवारी २७ नाेव्हेंबरला पैसे शेतकऱ्यांना मिळतील. शेतकऱ्यांचा चहा-नाष्टा हाेण्यापूर्वीच रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली असेल. याच वक्तव्याची आयाेगाने दाखल घेतली हाेती. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीcongressकाँग्रेस