शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

‘एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे योग्यच’, तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 13:13 IST

Indian Air Strike: चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत.

हैदराबाद - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड आत्मघातकी हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या जवानांना आज आदरांजली वाहिली जात आहे. मात्र त्याचदिवशी पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राईकवरून राजकारणाला तोंड फुटले आहे. आता तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये चुकीचे काय आहे. केंद्र सरकारपर्यंत माझं म्हणणं पोहोचवा, असे चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी केलेल्या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांचे वक्तव्य हे बेजबाबदार असून, त्यांनी हुतात्मा जवानांचा अपमान केला आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते रशिद अल्वी यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यात चुकीचे काय आहे, असे म्हटले आहे. जर आमच्याकडे पुरावे आहेत, व्हिडीओ आहेत म्हणून सरकार सांगत असेल, तर ते दाखवण्यात काय चुकीचे आहे, असा प्रश्न राशिद अल्वी यांनी विचारला आहे.

१४ फेब्रुवारी २०१४ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर काश्मीरमध्येही व्यापक मोहीम हातात घेत दहशतवाद्यांचे काश्मिरमधील नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलRahul Gandhiराहुल गांधी