शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:28 IST

Telangana Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी निशाणा साधला आहे.

या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसर मोदींनी निशाणा साधला आहे. निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर अचानक अदानी-अंबानींचं नाव घेणं कसं काय बंद केलंत? त्यांच्याकडून किती माल उचललात? असा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन काँग्रेसला विचारला.

तेलंगाणामधील करीमनगर येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मागच्या पाच वर्षांमध्ये सकाळी उठल्यापासून काँग्रेसचे राजकुमार एक जपमाळ ओढायला सुरुवात करायचे हे तुम्ही पाहिलंच असेल. जेव्हापासून त्यांचं राफेल प्रकरण जमिनीवर आलं. तेव्हापासून त्यांनी एक नव्या माळेचा जप सुरू केला. पाच वर्षांपासून ते एकाच माळेचा जप करत होते. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती. मग हळुहळू अंबानी- अदानी, अंबानी-अदानी म्हणायला लागले. मात्र जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हापासून यांनी अंबानी-अदानीवरून शिव्या देणं बंद केलं.

आता काँग्रेसच्या युवराजांनी या निवडणुकीत अंबानी आणि अदानींकडून किती माल उचलला, हे जाहीर करावं. काळ्या पैशांच्या गोण्या भरून रुपये आणले आहेत. की टेम्पोमध्ये भरून नोटा कांग्रेससाठी पोहोचल्या आहेत. नेमका काय सौदा झाला आहे ज्यामुळे तुम्ही रातोरात अंबानी आणि अदानींना शिव्या देणं बंद केलंय. पाच वर्षांपर्यंत शिव्या दिल्या आणि रातोरात बंद केल्या.  नक्कीच डाळीमध्ये काहीतरी काळं आहे. काही तरी चोरीचा माल टेंम्पोमध्ये भरून तुम्हाला मिळालाय. याचं उत्तर द्यावं लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिला.

या सभेमधून मोदींनी बीआरएसलाही टीकेचं लक्ष्य केलं. मोदी म्हणाले की, तेलंगाणाच्या स्थापनेवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. मात्र बीआरएसने जनतेच्या स्वप्नांचा भंग केला आङे. काँग्रेसचाही असाच इतिहास राहिलेला आहे. देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर काँग्रेसनेही हेच केलं.  देश बुडाला तर बुडाला, यांच्या कुटुंबाला काही फरक पडत नाही.  फॅमिली फर्स्ट धोरणामुळे काँग्रेसने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा अपमान केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेसच्या कार्यालयातही प्रवेश दिला गेला नाही. अखेर भाजपाने पी. व्ही. नरसिंह राव यांना भारत रत्न देऊन सन्मानित केले, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला. 

टॅग्स :telangana lok sabha election 2024तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीMukesh Ambaniमुकेश अंबानीGautam Adaniगौतम अदानीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४