शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

(मत)पत्रास कारण की... देशातील एका मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 14:36 IST

देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.

ठळक मुद्देदेशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नवी दिल्ली - देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.  मतदारसंघात ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान घेतल्यास प्रत्येक बुथवर तीन-तीन मशीन्स ठेवाव्या लागतील. त्यामुळे अडचणी निर्माण होतील म्हणूनच निवडणूक आयोगाने या मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मतपत्रिकेच्या एकाच कागदावर सर्व उमेदवारींची नावं आणि निवडणूक चिन्ह छापणं सोपं आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने अशाप्रकारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ईव्हीएम मशीनमध्ये या गोष्टी शक्य नाही. त्यासाठी तीन-तीन ईव्हीएम मशीन ठेवाव्या लागतील. त्यामुळे पसंतीच्या उमेदवाराला मतदान करताना मतदारांचा गोंधळ उडू शकतो, असं आयोगाने म्हटलं आहे. तसेच संबंधित मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी तयारी करण्याच्या सूचनाही आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात येत्या 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार  या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTelangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग