शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

तेलंगणात १६ व्या दिवशी सापडला पहिला मृतदेह; दहा फूट गाळाच्या खाली मशिनमध्ये दिसत होता हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:35 IST

तेलंगणात कोसळलेल्या बोगत्यातून १६ व्या दिवशी पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Telangana Tunnel Collapse:तेलंगणामध्ये बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ कामगांपैकी एकाचा मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. तेलंगणा येथे श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याचा एक कोसळला होता. अपघाताच्या वेळी कामगार बोगद्याच्या आत होते. बोगदाच्या काही भाग कोसळत असताना कामगार बाहेर पळत आले. मात्र त्यातले आठ जण आतच अडकले. या आठ कामगारांच्या शोधासाठी दोन आठवड्यांपासून बचावकार्य सुरू आहे. मात्र आता ढिगाऱ्याखाली दबलेल्या आठ जणांचा जीव वाचण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

तेलंगणा बोगदा दुर्घटनेच्या १६व्या दिवशी बचाव पथकाला पहिला मृतदेह सापडला. बोगद्यात शोध घेत असताना गाळाच्या खाली १० फूट खाली मशीनमध्ये गुरप्रीत सिंग नावाच्या कामगाराचा मृतदेह अडकलेला आढळून आला. त्याचा फक्त हात दिसत होता. त्यानंतर मशीनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नागरकुर्नूल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. इतर ७ मजुरांचा शोध सुरू आहे ज्यासाठी रोबोट आणि स्निफर डॉगची मदत घेतली जात आहे.

गुरप्रीत सिंग याचा मृतदेह कोसळलेल्या एसएलबीसी बोगद्यातून बाहेर काढण्यात आला होता. त्याचा मृतदेह पंजाबमधील मूळ गावी पाठवण्यात आला आहे. उर्वरित सात जणांना शोधण्यासाठी सोमवारीही बचावकार्य सुरूच आहे. रॉबिन्स कंपनीत टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) ऑपरेटर म्हणून काम करणारा गुरप्रीत सिंग हा त्या आठ जणांमध्ये होता. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुरप्रीतच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ४८ तासांहून अधिक काळ खोदकाम करुन गुरप्रीतचा मृतदेह बाहेर काढता आला. १० फूट खोल गाळाखाली तो मशीनसह गाडला गेला होता.

डाव्या कानातले आणि उजव्या हातावरच्या टॅटूवरुन सिंगची ओळख पटली. गुरप्रीत सिंग व्यतिरिक्त, अडकलेल्या इतर सात जणांमध्ये श्री निवास, मनोज कुमार (उत्तर प्रदेश), सनी सिंग (जम्मू आणि काश्मीर), संतोष साहू संदीप साहू, जगता खेस आणि अनुज साहू यांचा समावेश आहे, हे सर्व झारखंडचे आहेत.

दरम्यान, २०२० मध्ये एमबर्ग टेक एजी नावाच्या कंपनीने बोगद्याचे सर्वेक्षण केले होते. बोगद्यातील काही फॉल्ट झोन आणि कमकुवत खडकांच्या धोक्याबद्दल कंपनीने इशारा दिला होता. सर्वेक्षणाचा अहवालही बोगदा बांधणाऱ्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आला होता. १४ किमी लांबीच्या बोगद्यातील १३.८८ किमी ते १३.९१ किमी भागातील खडक कमकुवत असल्याचे अहवालात सांगितले होते. हा भागही पाण्याने भरला आहे. अहवालात ज्या भागाचे धोकादायक वर्णन करण्यात आले होते, तोच भाग पडला असं अधिकाऱ्यांनी म्हटलं. मात्र, राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने त्यांना अशा कोणत्याही अहवालाची माहिती नव्हती असं म्हटलं.

माध्यमांच्या वृत्तानुसार, अपघातानंतर बोगद्यात काम करणाऱ्या काही कामगारांनी भीतीपोटी काम सोडले आहे. या प्रकल्पात ८०० लोक काम करत आहेत. त्यापैकी ३०० स्थानिक तर उर्वरित झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघात