शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

दूरसंचार घोटाळ्याचा मोदी सरकारला फास?

By admin | Published: July 08, 2016 4:25 AM

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेवरून खाली खेचणारे दूरसंचार प्रकरण आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या गळ्याला फास लावत आहे.

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेवरून खाली खेचणारे दूरसंचार प्रकरण आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या गळ्याला फास लावत आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स, आयडिया, टाटा आणि एअरसेल कंपन्यांनी चार वर्षांत ४६,०४५.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न कमी दाखवून सरकारला कोट्यवधीची टोपी घातली आहे; तरीही सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. कंट्रोलर अ‍ॅण्ड आॅडिटर जनरल(सीएजी) यांच्या अहवालात हा खुलासा झाला की सरकारला या कंपन्यांकडून जवळपास १३ हजार ४८८ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. परंतु त्या दिशेने काही कारवाई होत असल्याचे संकेत अद्याप मिळत नाहीत. ज्या सीएजीच्या अहवालाने काँग्रेस सरकारला भ्रष्ट ठरविले त्याच सीएजीची नजर आता नरेंद्र मोदी सरकारवर आहे. गुजरात पेट्रोलियमच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची लक्तरेही सीएजी अहवालामुळेच समोर आली. आता दूरसंचारचा क्रमांक आहे. सरकारच्या भूमिकेमुळे सरकारी तिजोरीचे जवळपास ४५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजले जाते.मोदी सरकारविरोधात संधीच्या शोधात असलेल्या काँग्रेसने या घोटाळ्याशी संबंधित सगळा दस्तावेज जाहीर केला आहे. तो करण्याचा उद्देश एवढाच आहे की जे मोदी सरकार प्रामाणिकपणाचे ढोल वाजवत आहे ते गळ्यापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला, शक्ती सिंह गोहील आणि आर. पी. एन. सिंह यांनी क्रमाक्रमाने हा दस्तावेज जाहीर करून सरकार सरकारी तिजोरीला भगदाडे पाडून आपल्या मर्जीतील उद्योगसमूहांना फायदा मिळवून द्यायचा कसा प्रयत्न करीत आहे हे सिद्ध केले. सरकारी तिजोरीचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी सरकारची कोणती योजना आहे अशी विचारणा काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.वसुली का थांबवली?- मोदी सरकार मोजक्या कंपन्यांशी हातमिळवणी करून सरकारी तिजोरीचे नुकसान करण्यास हातभार तर लावत नाही ना? असे जर नाही तर सीएजीने सांगितल्यानंतरही मोठ्या प्रमाणावरील वसुली थांबविली का जात आहे?- सरकार या कंपन्यांकडून पैसा वसूल का करू इच्छित नाही? काँग्रेसने मोदी सरकार हे मुद्दामच करीत आहे; कारण कायदा दुबळा व्हावा आणि या कंपन्यांना या प्रकरणातून सुटण्यासाठी रस्ता मिळावा, असा आरोप केला आहे.