शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:14 IST

दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत. 

बलवंत तक्षक -

चंडीगड : हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार व अभिनेत्री कंगना रणौत ज्या ज्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या, त्या मंदिरांची स्वच्छता करणे आवश्यक आहे, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी केले आहे. दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत. 

कंगना दोन दगडांवर पाय ठेवून उभ्या आहेत...हिमाचल प्रदेशमध्ये देव समाजाची संस्कृती महत्त्वाची असून, तिच्या विरोधात काही गोष्टी सुरू आहेत. या समाजाला बदनाम करण्याचेही प्रयत्न होत आहेत. अशी कृत्ये करणाऱ्यांचा निवडणुकीत पराभव होणार हे निश्चित आहे. सिंह यांनी सांगितले की, रणौत या दोन दगडांवर पाय ठेवून उभ्या आहेत. त्यांचे एक पाऊल मुंबईत, तर दुसरे पाऊल हिमाचल प्रदेशमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना हार पत्करावी लागणार आहे. ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांनंतर कंगना रणौत यांच्या हाती पुन्हा मुंबईला परत जाऊन फक्त चित्रपटात काम करणे इतकेच उरणार आहे.

काँग्रेसने केली निदर्शनेभाजप उमेदवार कंगणा रणौत यांना सोमवारी लाहौल व स्पिती येथे काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. या प्रकाराची हिमाचल प्रदेश भाजपने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी व दोषी निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली. ‘कंगना रणौत परत जा,’ अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. रणौत यांनी दलाई लामा यांच्याबद्दल काही वादग्रस्त उद्गार काढले होते. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४