शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

काँग्रेस आणि तृणमूलमधील तणाव वाढला, राहुल गांधींच्या यात्रेचे पोस्टर फाडले, ममता त्याच दिवशी घेणार रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 17:18 IST

Bharat Jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत. तसेच तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार, अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे. या घोषणेनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे. तसेच बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात राहुल गांधींच्या यात्रेचे काही पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर फाडण्यात आले आहेत. मात्र हे पोस्टर कुणी फाडले, याबाबतची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही २५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार आहे. मात्र ही यात्रा कोलकाता येथे जाणार नाही.

गुरुवारी पश्चिम बंगालमधील कुचबिहारमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दाखल होणार आहे. याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी आपल्या रॅलीचं आयोजन केलं आहे. ममता बॅनर्जींनी आरोप केला की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण आतापर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. आम्ही इंडिया आघाडीचे घटक आहोत. मात्र असं असूनही राहुल गांधींच्या यात्रेबाबत आमच्यासोबत काही बोलणं झालं नाही. तसेच पश्चिम बंगालशी संबंधित कुठल्याही गोष्टीबाबत आमच्यासोबत चर्चा झाली नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कांग्रेसला मोठा धक्का देताना राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत माझा कुणाशीही संपर्क झालेला नाही. बंगालमध्ये कुठल्याही पक्षात ताळमेळ जुळलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुकीत उतरेल. मी दिलेला कुठलाही प्रस्ताव इंडिया आघाडीने मान्य केलेला नाही. त्यामुळे आमचा पक्ष स्वबळावर निवडणुकीत लढणार आहे.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जी