शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

मणिपूरमध्ये तणाव; 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद, CBI संचालक स्पेशल फ्लाइटने पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 23:25 IST

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे.

मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा रविवार (1 ऑक्टोबर) संध्याकाळी 7.45 पर्यंत बंद राहील.  पाच महिन्यांनंतर राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. 

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे.

...म्हणून पुन्हा सुरू झाला तणाव - मणिपूरमध्ये जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर इंफाळमधील शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे फिजाम हेमजीत (20) आणि हिजाम लिनथोइनगांबी (17) असे आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री एन बिरेन सिंह - राज्यातील तणावादरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले, बेपत्ता विद्यार्थ्यांच्या दुःखद मृत्यूसंदर्भात, मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की, दोषींना पकडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत.

बिरेन सिंह म्हणाले, "महत्त्वाच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी सीबीआयचे संचालक एका विशेष पथकासह बुधवारी सकाळी विशेष विमानाने इम्फाळला पोहोचतील. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात आहे. जेणेकरून गुन्हेगारांना शोधता येईल. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेटSchoolशाळाPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग