शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

दहशतवाद खपवून घेणार नाही -गृहमंत्री

By admin | Published: December 13, 2015 10:42 PM

रालोआ सरकारने दहशतवाद मुळीच खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करताना स्पष्ट केले.

नवी दिल्ली : रालोआ सरकारने दहशतवाद मुळीच खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करताना स्पष्ट केले.भारताला सुरक्षित राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते एका संदेशात म्हणाले. १४ वर्षांपूर्वी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांचे हौतात्म्य देश कधीही विसरणार नाही. शूर सुरक्षा जवानांनी दाखविलेल्या धैर्याला मी सलाम करतो, असे त्यांनी नमूद केले. पाच बंदूकधाऱ्यांनी संसदेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दिल्लीचे पाच पोलीस, सीआरपीएफची एक महिला पोलीस अधिकारी, संसदेतील दोन रक्षक आणि एक माळी असे नऊ जण शहीद झाले. > मोदींच्या उपस्थितीत संसदेत आदरांजली...लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला, राज्यसभेचे सभापती पी.जे. कुरियन, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सत्यनारायण जतिया आदी त्यावेळी उपस्थित होते. यावेळी मोदींनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांनी रविवारी संसद परिसरामध्ये आयोजित कार्यक्रमात शहिदांना आदरांजली अर्पण केली.