शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

एलओसी ओलांडणारे दहशतवादी जिवंत राहणार नाहीत; 'नगरोटा ऑपरेशन'नंतर लष्करप्रमुखांचा इशारा

By कुणाल गवाणकर | Updated: November 19, 2020 21:20 IST

लष्करप्रमुख मनोज नरवणेंचा पाकिस्तानला इशारा; नगरोटामधील कारवाईचं कौतुक

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आल्यानं ते मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत होते अशी दाट शक्यता सुरक्षा दलातल्या सुत्रांनी वर्तवली. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडणारे दहशतवादी जिवंत राहणार नाहीत, असं नरवणे म्हणाले.एलओसी ओलांडणारे दहशतवादी जिवंत राहणार नाहीत. सीमा ओलांडणारा एकही दहशतवादी माघारी परतू शकणार नाही, अशा शब्दांत नरवणेंनी पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना अतिशय स्पष्ट संदेश दिला आहे. आज सकाळी नगरोटामध्ये करण्यात आलेल्या कारवाईचं त्यांनी कौतुक केलं. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलानं अतिशय उत्तम ताळमेळ राखून नगरोटामध्ये कारवाई केल्याचं लष्करप्रमुख म्हणाले.एलओसीवर कोणताही गोळीबार नाही; 'पिन पॉईंट स्ट्राईक'च्या चर्चेवर लष्कराचं स्पष्टीकरणसुरक्षा दलांनी नगरोटामध्ये केलेली कारवाई अतिशय यशस्वी झाली. सर्व सुरक्षा दलांमध्ये किती उत्तम ताळमेळ होता, ते या कारवाईवरून दिसतं. नगरोटामधील ऑपरेशन शत्रू आणि दहशतवाद्यांसाठी अतिशय स्पष्ट संदेश आहे. जो कोणी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला याच पद्धतीनं उत्तर मिळेल. सीमा ओलांडून येणारा एकही दहशतवादी जिवंत परत जाणार नाही, असं नरवणे म्हणाले.नगरोटामध्ये भारतीय सुरक्षा दलांच्या कारवाईत दहशतवाद्यांचा खात्माआज पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवादी एका ट्रकमधून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस दलाचा विशेष अभियान समूह (एसएसजी), केंद्रीय राखीव पोलीस दलासह (सीआरपीएफ) लष्कराचे जवान अलर्टवर होते. सुरक्षा दलांनी टोल नाक्याजवळ ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरू झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून ११ एके-४७ रायफल, ३ पिस्तुलं, २९ ग्रेनेड आणि अन्य उपकरणं जप्त करण्यात आली.

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी