शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:28 IST

26 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही मिराज 2000 या विमानात स्पाइस 2000 मिलाइल बॉम्ब भरुन लोड केलं होतं. मिसाईलमध्ये टार्गेट कोड फिड केला. त्या रात्री 2 च्या दरम्यान आम्ही उड्डाण घेतलं होतं.

नवी दिल्ली - 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालकोट भागात घुसून दहशतवादी तळांना टार्गेट केले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांना भारताने क्षणार्धात उद्ध्वस्त केले. या भारतीय हवाई दलाच्या मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या दोन पायलटने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अवघ्या 90 सेकंदामध्ये त्यांनी लक्ष्य साध्य केलं.तसेच मिशनची गोपनीयता असल्याने त्यांच्या कुटुंबालाही याची कल्पना नव्हती. 

गेल्या 48 वर्षामध्ये पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाने पाकच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत बालकोटमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली होती. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. 

भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकसाठी मिराज-2000 या विमानांचा उपयोग केला होता. हिंदूस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या एका पायलटने 90 सेकंदात आपलं लक्ष्य साध्य करत दहशतवाद्यांच्या तळावर मिसाईल डागली. या ऑपरेशनची माहिती खूप कमी जणांना देण्यात आली होती. एअर स्ट्राईकच्या दिवशी जेव्हा टीव्हीवर या बातम्या येऊ लागल्या तेव्हा पायलटच्या पत्नीने तुम्ही या मिशनमध्ये होता का? असं विचारलं असता त्याला काहीच उत्तर न देता पुन्हा झोपी गेलो असं पायलटने सांगितले. 

मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या दुसऱ्या पायलटने सांगितले की, आम्ही खूप साऱ्या कॉम्बेट एअर पेट्रोलसह नियंत्रण रेषेवरुन उड्डाण घेतलं. एलओसीवर एकाच वेळी कॉम्बेट एअर पेट्रोल उडविण्यामागे पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेला चकमा देणं हे उद्दिष्ट होतं. एअर स्ट्राईकच्या दोन दिवस आधीपर्यंत या मिशनची माहिती कोणालाच नव्हती. आम्हाला काहीतरी होणार एवढं माहित होतं पण नक्की काय होईल याची कल्पना नव्हती असं पायलटने सांगितले. 

26 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही मिराज 2000 या विमानात स्पाइस 2000 मिलाइल बॉम्बने लोड केलं होतं. मिसाईलमध्ये टार्गेट कोड फिड केला. त्या रात्री 2 च्या दरम्यान आम्ही उड्डाण घेतलं होतं. पाकिस्तानला चकमा देण्यासाठी सुखोई 30 एमकेआय तैनात करण्यात आलं होतं. हल्ल्यानंतर फोटो घेण्यासाठी हेरोन ड्रोन सज्ज होतं. आम्ही देशाच्या पूर्वेकडून उड्डाण घेत काश्मीरला पोहचलो. तिथे पोहचल्यानंतर आम्ही रेडिओ बंद केला. आमच्या आजूबाजूला कोणतंही पाकिस्तानचं लढाऊ विमान नव्हतं हे महत्वाचं होतं. मिसाईलने आपलं काम केलं. आम्ही शत्रूंना टार्गेट केलं अशी माहिती पायलटने दिली. 

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी